Homeडेली पल्स.. आता मिलेट्स...

.. आता मिलेट्स सेंटरची पळवापळवी!

महाराष्ट्रात पाण्याची पळवापळवी यापूर्वी घडलेली आहे. धरणांच्या जागाही राजकीय सोयीने बदलल्या गेल्या आहेत. पण केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केल्यानंतर आता मिलेट्स सेंटरची पळवापळवीही झाल्याचे उघड झाले आहे.

कॉँग्रेसच्या आमदार प्रणिती शिन्दे यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे यासंदर्भातील मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. राज्याच्या अर्थसंकल्पात मिलेट्स सेंटर सोलापूरमधे स्थापन केले जाईल, असे जाहीर करण्यात आले आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली गेली. पण, गेल्या महिन्यात शासनाने आदेश काढून हे मिलेट्स सेंटर बारामतीला नेल्याचे जाहीर केले आहे, याकडे प्रणिती शिन्दे यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.

मिलेट्स

सोलापूरचे आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनीही या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात हे श्री अन्न केंद्र सोलापूरला देण्यात आले होते. पण, नोहेंबर २०२३मध्ये परिपत्रक काढून आता हे केंद्र बारामतीला स्थापन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रणिती शिन्दे आणि सुभाष देशमुख या दोघांनीही अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा विकास करा, बारामतीला निधीही द्यावा पण अर्थसंकल्पात सोलापूरला जाहीर केलेले केंद्र बारामतीला पळवू नये, अशी मागणी सरकारडे केली. सुभाष देशमुख म्हणाले की, अजित पवार बारामतीचे नाहीत तर राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आपण अजित पवारांशी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्याशीही चर्चा केली आहे. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने यासंदर्भात उत्तर देण्यात आले नाही.  

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content