Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीअजितदादांच्या ‘आजारा’वरील जालीम...

अजितदादांच्या ‘आजारा’वरील जालीम उपायासाठी शिंदे-फडणवीस दिल्लीत?

राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडच्या काळात वारंवार ‘आजारी’ पडत असल्याने त्यांच्या ‘आजारपणावर’ जालीम इलाज व्हावा याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने राजधानी नवी दिल्ली येथे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

राज्य मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या इतर ज्येष्ठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदे बहाल करण्यात आली. मात्र सत्तेत दाखल झाल्यापासून शरद पवार यांच्या गटाने अजितदादांना कोंडीत पकडण्यासाठी विविध डावपेच अंगीकारले. यामध्ये अजितदादांबरोबर गेलेले दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा दिग्गज मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेणे, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच युवा नेते रोहित पवार आणि दस्तूरखुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात करणे, आदींचा समावेश आहे.

अजित

एकीकडे हे सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेदेखील राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. अशा स्थितीत आपल्याला तसेच आपल्याबरोबर असलेल्या गटाला सांगितल्याप्रमाणे सत्तेत वाटा द्यावा, असा आग्रह अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, विविध पालकमंत्रीपदे तसेच महामंडळांची अध्यक्षपदे अशा सर्व मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही आहेत.

यासाठी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार तसेच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेत हवे तसे स्थान मिळाल्याचे दिसून आले नाही. इतकेच नव्हे तर वित्त खाते सांभाळणाऱ्या अजितदादांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाची फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहीला पाठवण्यात येईल, असे आदेश निर्गमित झाले. त्यामुळे सत्तेत असलेल्या अजितदादांची आणखीनच कोंडी झाली, असे बोलले जाते.

अजित

याचा परिणाम असा झाला की, काही महत्त्वाच्या ठिकाणी किंवा बैठकांना उपमुख्यमंत्री पवार हजर राहत नाहीत. त्यांच्या प्रकृती आस् वास्थ्याचे कारण पुढे केले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले असता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर या तिघांमध्ये एक बैठकही झाली. मात्र या सर्व दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा कुठेच दिसून आले नाहीत. आजही दिल्लीमध्ये जीएसटीविषयक निर्णय घेणाऱ्या समितीची (जीएसटी कौन्सिल) बैठक होती. वित्तमंत्री या नात्याने अजित पवार यात सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र पुन्हा आजारपणाचे कारण पुढे करत त्यांनी हा दौरा टाळला. त्यानंतर मुंबईतच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दादांनी दांडी मारली. यामुळे दादांच्या नाराजीबद्दलच्या चर्चेला ऊत आला. त्यातच अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ट्रिपल इंजिन सरकारमधले एक इंजिन बिघडले असल्याचा दावा करत अजितदादांवर निशाणा साधला हे. दरम्यान, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सुरू असलेली बैठक आटोपती घेत उपमुख्यमंत्री फडणवीस तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाल्याचे कळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांच्यासोबत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जाते. मुंबईतही अजित पवार यांनी देवगिरी, या आपल्या शासकीय निवासस्थानी आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावल्याचे समजते.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content