Homeटॉप स्टोरीराहुल गांधींनी आळवला...

राहुल गांधींनी आळवला पुन्हा ‘जेपीसी’चा राग!

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या चीनच्या नागरिकाला भागीदार म्हणून घेणाऱ्या अदानी समुहाच्या आर्थिक व्यवहारांची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केली.

आजपासून मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ब्रिटनच्या एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी आणि त्यांच्या दोघा भागीदारांनी भारतातून एक बिलियन डॉलर परदेशात पाठवले. त्यानंतर हेच पैसे पुन्हा भारतात आले. हे पैसे कोणाचे आहेत? ते जर अदानींचे असतील तर तसे  स्पष्ट करा. नाही तर ते कोणाचे आहेत, यामागे मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.

अदानी समुहातल्या या दोन भागीदारांपैकी एक भागीदार चँग चुग लिंग चीनचा भागीदार असून चीन हे भारतासाठी धोकादायक राष्ट्र आहे. अदानी संरक्षण मंत्रालयातही कामे घेतात. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मग अशावेळी या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सेबीने अदानी समुहाला क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट देणारे तत्कालीन अध्यक्ष आता अदानींच्या एका वृत्तवाहिनीच्या संचालकपदावर काम करत आहेत. त्यामुळे या चौकशीबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच अदानी समुहाच्या व्यवहारांची जेपीसीमार्फत चौकशी केली गेली पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी केली.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content