Homeएनसर्कलनितीन गडकरींनी इथेनॉलवर...

नितीन गडकरींनी इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार केली लॉन्च!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे म्हणजेच इथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे नुकतेच उद्घाटन केले. हे वाहन टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने विकसित केले आहे.

या कार्यक्रमाला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझु योशीमुरा, किर्लोस्कर सिस्टिम्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली किर्लोस्कर, जपानच्या दूतावासातील राजदूत, सरकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉल हे स्वदेशी, पर्यावरण-स्नेही आणि नवीकरणीय इंधन असून भारतात या इंधनाला मोठा वाव आहे. मोदी सरकारने इथेनॉलच्या वापरावर दिलेला भर उर्जेच्या संदर्भातील स्वयंपूर्णता मिळवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, उर्जादाते म्हणून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे या उद्दिष्टांसह त्यांना अन्नदाता म्हणून मदत करणे आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणे सुरु ठेवणे यांना अनुसरून आहे.

ते म्हणाले की ज्या दिवशी इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटी रुपयांची होईल तेव्हा कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर सध्याच्या 12% वरुन 20% पर्यंत पोहोचेल. जैवइंधनांच्या क्षेत्रातील अभिनव संशोधनांबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आसाममधील नुमलीगड येथे भारतीय तेल महामंडळाने उभारलेल्या तेल शुद्धीकरण केंद्राचा उल्लेख चर्चा केला. या केंद्रामध्ये जैवइथेनॉल निर्मितीसाठी बांबूचा वापर केला जातो.

आज उद्घाटन झालेले हे अभिनव पद्धतीचे वाहन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे आणि त्याची निर्मिती करताना भारताच्या अधिक कठोर उत्सर्जनविषयक मानकांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ते जागतिक पातळीवरील सर्वात पहिले बीएस 6 (पातळी 2) ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईप वाहन ठरले आहे.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content