Homeडेली पल्सउपसभापतीपदावरून डॉ. नीलम...

उपसभापतीपदावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांना हटवा!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.

आज परिषदेच्या सभागृहात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घटनात्मक पेच सोडवावा यासाठी नंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावरून हटवा, अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ऍड. जनरल यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे, अशी मागणीही आम्ही केल्याचे दानवे यांनी सांगितले.

नीलम

विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षांतर केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. आणि सभापती नसल्यामुळे यावर निवाडा कोण करणार, असा सवालही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हल्ला परतवताना नोटीस दिल्याशिवाय हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज विधानमंडळ सचिवांकडे डॉ. नीलम गोऱ्हे, विप्लब बाजोरिया तसेच प्रा. मनीषा कायंदे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. यावर काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content