Homeटॉप स्टोरीराष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही...

राष्ट्रवादीच्या नेमणुकीतले काही जण आता पक्षातही नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या घटनात्मक चौकटच नव्हती. तेव्हा असलेली काही नावे आता पक्षातही नाही. अशा स्थितीत शरद पवार यांच्या गटाने केलेली कोणतीही कारवाई अधिकृत कारवाई म्हणून मानताच येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घटना आहे या घटनेचे पालन करत आम्ही 30 जूनला झालेल्या बैठकीत काही निर्णय घेतले. त्यामध्ये माझी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार यांची पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांची विधानसभेचे प्रतोद तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली. त्याचदिवशी आम्ही सर्व प्रतिज्ञापत्रांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यांची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत घेतलेल्या आक्षेपाबद्दल निर्णय घेऊ शकतील. तोपर्यंत आमच्यावर कारवाई करण्याचे कोणत्याही अधिकार शरद पवार किंवा त्यांच्या पाठीराख्यांना नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी काल दिल्लीत बोलावलेली बैठक ही राष्ट्रवादीची अधिकृत बैठक नाही. पक्षाची निवडणूक ब्लॉक स्तरावरून अध्यक्षांपर्यंत अशा पद्धतीने होत असते. अशा पद्धतीची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून झालीच नाही. झाल्या त्या फक्त नियुक्त्या. त्यामुळेच आमच्यावर हे कारवाई करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवालाही त्यांनी यावेळी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content