Homeएनसर्कलपावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा...

पावसाळ्यासाठी परिवहन मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष सज्ज!

मान्सून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात चोवीस तास कार्यरत असेल (दूरध्वनी  क्र. 011-23718525 https://morth.nic.in).

देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या परीचालनावर अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या, उदा., वाहतूक विस्कळीत होणे, खराब दृश्यमानता आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात, पाणी साचणे, रस्त्यावरील अडथळे आणि दरडी कोसळणे, इत्यादी समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाच्या कर्तव्यतत्परतेसाठी समर्पित चमू तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सार्वजनिक तसेच सरकारी संस्थांकडून आलेले कॉल प्राप्त करणे आणि राष्ट्रीय महामार्गांच्या परीसंचालनाशी संबंधित पावसाळ्याशी संबंधित घटनांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख समाविष्ट आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे किंवा नुकसानीशी संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि संरचना विकास कार्यालय (एनएचआयडीसीएल)यांच्या संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे नियंत्रण कक्षातील चमूंना बंधनकारक करण्यात आले आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content