Homeमाय व्हॉईसतुम्ही कर्जतच्या फार्महाऊसवर...

तुम्ही कर्जतच्या फार्महाऊसवर सर्व्हे केला का?

महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी संजय राजाराम राऊत यांनी आपल्या मालकांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला होता हे सांगावे. हे सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर बसून केले होते का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

शिंदे सरकारच्या सर्व्हेबद्दल संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे सरकारी बंगल्यात बसून केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना नितेश राणे बोलत होते. अडीच वर्षे तुमच्या मालकांमुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला. पिछाडीला गेला. तरीही तुमच्या मालकांना दर तीन महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार कसा काय मिळाला? याचा सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर झाला होता की डिनो मोरयाच्या घरी, याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी. दुसऱ्यांचा सर्व्हे आल्यावर तुमच्या बुडा खाली चांगली आग लागते. पण तुमचे मालक आणि त्यांचा मुलगा बॉलिवूडच्या कलाकारांना स्वतःची लाल करून घेण्यासाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचे, याची माहिती मी देऊ का? त्या एजन्सीची माहिती देऊ का? म्हणजे तुम्हालाही कळेल की करोडोचा पैसा देऊन हे बॉलीवूडचे कलाकार तुमचे मालक आणि त्यांच्या मुलाची कशी लाल करायचे…, असा सवाल त्यांनी केला.

आमचे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लोकांच्या मनात असलेले काम करत आहे. गतिमान महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे हे असे सर्व्हे येत आहेत. हे सर्व्हे तुम्ही जेवढे लवकर पचवाल तेव्हढे जास्त पोट साफ होईल. नाही तर हाजमोलाचा एक डबा पाठवतो. खात बसा आणि सर्व्हे वाचत बसा… असेही नितेश राणे म्हणाले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content