Homeपब्लिक फिगरथकलेले कोट्यवधींचे भाडे...

थकलेले कोट्यवधींचे भाडे मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातील गोळीबार एसआरए योजनेतील प्रकल्पग्रस्त गरीबांना त्यांचे थकलेले कोट्यवधी रूपयांचे भाडे कधी मिळणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला.

झिशान सिद्दीकी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्न विचारताना नितेश राणे म्हणाले की, कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवण्याइतकी वाईट परिस्थिती सदर विकासकाची नाही. हा लहान बिल्डर नाही. सध्याची मार्केटची स्थिती त्याला लागू पडत नाही. त्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे भाडे थकवणे ही या बिल्डरची मस्ती आहे. त्यामुळे तातडीने त्यावर कारवाई करून त्याला भाडे देण्यास भाग पाडावे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिले. याबाबत आपण लवकरात लवकर विकासक, म्हाडा तसेच एसआरएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलावू आणि प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेले भाडे देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याआधी झिशान सिद्दीकी यांनी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विकासक बदलण्याची तसेच प्रकल्पग्रस्त भाडेकरूंचे थकलेले सुमारे १२ कोटी भाडे देण्यास विकासकाला भाग पाडण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी सांगितले की, ३-के नियमाखाली सुरू झालेल्या काही सुरूवातीच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तो रद्द करणे योग्य होणार नाही. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांचे थकलेले भाडे मिळण्यासाठी आपण एक संयुक्त बैठक बोलावू.

एसआरए व म्हाडाची गंगाजळी रिकामी

आशिष शेलार यांनी हा प्रकल्प एसआरएने पूर्ण करावा. तसेच इतरत्रही रखडलेल्या प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नवे प्रकल्प राबविण्याची ताकद एसआरएकडे नाही. म्हाडाही, याला दे, त्याला दे करत रिकामी झाली आहे. अशा स्थितीत एक नवा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. अशा योजना म्हाडा आणि एसआरए एकत्रितपणे राबवतील. प्रकल्पग्रस्तांसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम म्हाडा आणि एसआरए करेल आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा लीलाव केला जाईल. वांद्रे ते कुलाब्याच्या बधवार पार्कपर्यंत अशाप्रकारे योजना राबविल्या जातील. त्यामुळे म्हाडा आणि एसआरएकडे भरपूर पैसा येईल.

योगेश सागर यांनी, असा प्रयोग करताना आपले मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. सावध राहवे, असा सल्ला दिला आणि एकच हंशा पिकला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content