Homeटॉप स्टोरीराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर?

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नव्याने लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे.

भाजपा नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत, येणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणू शकणाऱ्या आमदारालाच मंत्रीपदाचे बळ द्यावे, असे निश्चित करण्यात आले. या निकषामुळे भाजपा तसेच शिवसेनेच्या सध्याच्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या मंत्र्यांना नारळ मिळाला तरी हायकमांडसमोर त्यांचे काही चालत नाही. मात्र शिवसेनेचे तसे नाही. उद्धव ठाकरेंना बाजूला करून पक्ष शिंदे यांच्या दावणीला बांधण्याच्या प्रक्रियेत शिंदेंसोबत असलेले जे काही मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बाजूला सारल्यास पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंकडून हा कथित प्रस्तावित विस्तार लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्री या निकषात बसत नाहीत. किंबहुना त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाची छबीही खराब होत आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडून ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारविषयी नाराजी आहे. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्यात कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले आहेत. संजय राठोडविरोधात भाजपा समर्थक औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. एका युवतीच्या आत्महत्त्या प्रकरणानेही त्यांची प्रतीमा वादात राहिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार नेहमीच अडचणीत आले आहे. केंद्राच्या कृषि योजनांचा लाभ खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यातही ते अपयशी ठरले आहेत. संदीपान भुमरे यांची कामगिरीही बऱ्यापैकी प्रभावहीन राहिली आहे. त्यामुळे हे पाच मंत्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रडारवर आहेत. मात्र, शिवसेनेतल्या उठावात याच पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खंबीरपणे साथ दिल्याने शिंदेंच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा कसा काढायचा आणि त्यानंतर विस्तार कसा करायचा, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content