Homeटॉप स्टोरीमहापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही...

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळावर?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतानाच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने चालवली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.

या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. मात्र, मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याविषयी त्यांनी मौन पाळले.

याच बैठकीत पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार, जितेंद्र आव्हाडांवर ठाणे-पालघरची, धनंजय मुंडेंवर नाशिक, नगरसह मराठवाड्याची, अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणाची, तर अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र शिंगणेंवर विदर्भातल्या अमरावती विभागाची, शशिकांत शिंदेंवर सांगली, सातारा आणि कोल्हापूरची जबाबदारी, तर सुनील शेळकेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपावण्यात आली असल्याचे कळते.

राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिबिरांमध्ये राज्यातील प्रश्नांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी, म्हणजेच येत्या १० जूनला राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचे  आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आणि छत्रपती राज्याभिषेक दिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content