Homeडेली पल्सउद्धवजी.. तेव्हा तुमची...

उद्धवजी.. तेव्हा तुमची नैतिकता कोणत्या डब्यात बंद होती?

उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मग भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवताना आपण आपली नैतिकता कोणत्या डब्यात बंद केली होती, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांनी खुर्चीकरीता विचार सोडला तर एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत होते, मंत्री होते. ते सत्ता सोडून विरोधकांकडे म्हणजे आमच्याकडे आले. हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांना कळलं की, आपल्याकडे संख्याबळ नाही, आपण हरणार आहोत. आपले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे लाजेपोटी, भीतीपोटी अविश्वासाच्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असेही फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा, लोकमताचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळेला अपात्र सदस्यांच्या अपात्रतेच्या विषयावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे दिले. हे प्रकरण इतके असाधारण नाही की आम्ही त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले आहेत, तसे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यांना आम्ही कोणत्याही पद्धतीची बाधा आणू शकत नाही. एकाच पक्षावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी दावा केल्यानंतर अध्यक्षांना याचा अधिकार आहे की ते राजकीय पक्ष कोणता आणि कोणाकडे आहे, हे निश्चित करू शकतात. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रित केले हे योग्यच आहे,  संवैधानिकच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

घटनाबाह्य बोलणारे झाले कालबाह्य – एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने चांगली चपराक बसली असून ते आता कालबाह्य झाले आहेत. सदस्यांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्ष मेरीटप्रमाणे निर्णय करतील.

आजही हे लोक म्हणतात की, आमच्याच पक्षाचा व्हिप लागणार… माणसे किती आहेत? तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही तो वाचवला. त्याला वाचवण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह दिले आहे. त्यामुळे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे शिवसेना, शिवसेना करत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Continue reading

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात...
Skip to content