Homeडेली पल्सआमदारांना अपात्र ठरविण्याचा...

आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांनाच?

आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त विधानसभेच्या अध्यक्षांनाच आहे, अन्य कोणालाही नाही, असे स्पष्ट मत राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केले.

नार्वेकर येत्या दोन दिवसांत लंडनच्या दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी त्यांनी आज माध्यमांशी वार्तालाप केला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सोळा विधानसभा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच नार्वेकर यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे.

न्यायालयाने न्यायालयाचे काम करावे. विधिमंडळाने विधिमंडळाचे काम करावे आणि प्रत्येक स्वायत्त संस्था त्या-त्या पद्धतीने आपापले काम करतच असते. कायदा आणि संविधान प्रत्येकाला समान लागू असतो. नियम एकाला एक लागतो आणि दुसऱ्याला दुसरा असे होत नाही. इथल्या प्रत्येक नागरिकाला एकच नियम लागतो, असे सांगताना ते म्हणाले की, सदस्यांच्या निलंबनाचा निकाल अध्यक्षांव्यतिरिक्त कोणी घेईल असे वाटत नाही. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही विधानसभेचे अध्यक्ष आहोत आणि आपण जोपर्यंत या अधिकारपदावर आहोत तोपर्यंत अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभेतील कोणीही व्यक्ती म्हणजे उपाध्यक्षही निर्णय घेऊ शकणार नाहीत.

Continue reading

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात...
Skip to content