Homeटॉप स्टोरीआजपासून राज्य सरकारचे...

आजपासून राज्य सरकारचे ‘देखो आपला महाराष्ट्र’!

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटनस्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टूर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसास्थळे लाभली आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटनस्थळांचा खजिना आहे. 900पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400च्या आसपास गडकिल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्रकिनारा, व्याघ्रप्रकल्प, जैविक विविधतांनी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन, दरी इ. सर्वांना आकर्षित करतात. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टूर पॅकेज सुरू केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबईमध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ सहली, मेस्मरायजिंग कोकणमध्ये दहा सहली, कल्चरल पुणेमध्ये सात सहली, स्पिरीचुअल नाशिकमध्ये चार सहली, मिस्टीकल अमरावतीमध्ये दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भमध्ये पाच सहली, अशा या टूर पॅकेजमधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टूर पॅकेजेसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टूर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content