Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच...

उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतरच राहुल गांधी ‘मातोश्री’वर!

उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काल काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये, पक्षाच्या इतर नेत्यांकडून होणारे त्याचे समर्थन, सावरकरांबद्दल उद्धव ठाकरे गटाची भूमिका, अशा विविध परस्परविरोधी भूमिकांचा महाविकास आघाडीवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी काल रात्री वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर वेणूगोपाल तसेच उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे एका पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले. 

मीकरणाविरोधातील समीकरण – उद्धव ठाकरे

यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण म्हणून सर्व पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.

मागे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास आहे. ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो. एक नाते निर्माण होते. भाजपसोबत २५-३० वर्षं होतो. पण होतो… त्यांना किंमत नव्हती. ठिक आहे. त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ते आम्हाला साथ देतील, असेही ठाकरे म्हणाले.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content