Homeटॉप स्टोरीमहाविकास आघाडीच्या वज्रमूठ...

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पटोलेंची दांडी!

एकीकडे राज्यात विविध ठिकाणी शिवसेना व भाजपाची स्वा. सावरकर गौरव यात्रा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वज्रमूठ सभेकडे जनतेचे लक्ष लागले होते. मात्र या जाहीर सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनवेळी दांडी मारली. त्यामुळे आघाडीची ही वज्रमूठ किती काळ टिकणार अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगू लागली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माफी मागण्यास नकार देताना आपण गांधी आहोत, सावरकर नाही, असे भाष्य केले होते. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. याचाच परिपाक पुढे स्वा. सावरकर गौरव यात्रा काढण्याच्या घोषणेत झाली. एकूण वातावरण लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल जाहीर निषेध केला. त्यामुळे आजच्या सभेत सावरकर या विषयावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशा वातावरणात सावरकरांच्या बाजूने भूमिका घ्यायची की विरोधात अशा कोंडीत सापडलेल्या नाना पटोले यांनी सभेला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांनी मात्र हजेरी लावून भाषणे ठोकली. परंतु त्यात सावरकरांवर कोणतेही भाष्य केले नाही.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content