Homeटॉप स्टोरीप्रशिक्षण आयआयटीचे, चुना...

प्रशिक्षण आयआयटीचे, चुना लावला १४ कोटींचा!

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग –आठ(VIII)च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राव आयआयटी एकेडमी नावाचे क्लासेस चालवणाऱ्या कंपनीकडून विद्यार्थ्यांकडून जीएसटीच्या नावावर उकळण्यात आलेल्या १४ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचे या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.

मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रा. लि. ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी, या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते. या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर १८% जीएसटी कर (GST) वसूल केल्याचा संशय आहे. परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशाप्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्काचा कंपनीकडून गैरवापर केल्याचे मानले जाते.

याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, २०१७च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२ (१) (डी)च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी, (CGST) कायद्याच्या कलम १३२ (१) (आय) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलेअसता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीतशोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग  असून यामुळे कर चोरी करणाऱ्यांवर आळा बसेल, असे बोलले जाते.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content