Homeटॉप स्टोरीप्रशिक्षण आयआयटीचे, चुना...

प्रशिक्षण आयआयटीचे, चुना लावला १४ कोटींचा!

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग –आठ(VIII)च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राव आयआयटी एकेडमी नावाचे क्लासेस चालवणाऱ्या कंपनीकडून विद्यार्थ्यांकडून जीएसटीच्या नावावर उकळण्यात आलेल्या १४ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचे या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.

मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रा. लि. ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी, या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते. या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर १८% जीएसटी कर (GST) वसूल केल्याचा संशय आहे. परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशाप्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्काचा कंपनीकडून गैरवापर केल्याचे मानले जाते.

याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, २०१७च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२ (१) (डी)च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी, (CGST) कायद्याच्या कलम १३२ (१) (आय) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलेअसता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीतशोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग  असून यामुळे कर चोरी करणाऱ्यांवर आळा बसेल, असे बोलले जाते.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content