Homeएनसर्कलरणजित सावरकरांच्या मातोश्री...

रणजित सावरकरांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज, मंगळवारी २१ मार्च २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज सावरकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले तर त्यांचे कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष असून मुरबाड येथे ते राहतात.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात, स्वामिनी सावरकर त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. पती विक्रम सावरकर यांच्यासोबत त्यांनी प्रज्वलंत नावाच्या वृत्तपत्राचे कामही सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही त्यांनी पाहिले. तेथे त्या कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोखले असे होते. आईचे नाव मनोरमा गोखले असे होते. विवाहापूर्वीचे त्यांचे नाव मंदाकिनी गोखले होते. त्यांना दोन बहिणी आणि एक बंधू होते. त्यांचा विवाह ११ मे १९५८ या दिवशी विक्रम सावरकर यांच्याशी झाल्यानंतर  सावरकर कुटुंबात स्वामिनी म्हणून त्यांचे आगमन झाले. तेव्हापासून सामाजिक कार्य, संपादनकार्य यासह विविध क्षेत्रात त्या स्वामिनी विक्रम सावरकर म्हणून ओळखल्या जात.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content