Homeटॉप स्टोरीसंगीत रजनीच्या आयोजनात...

संगीत रजनीच्या आयोजनात नीलम गोऱ्हेंना डावललेच नाही?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनाच्या प्रांगणामध्ये विधिमंडळाचे सदस्य तसेच काही निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नितीन मुकेश यांच्या संगीत रजनीच्या आयोजनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना विश्वासात घेतले नसल्याच्या चर्चेचे आज विधानसभेत पडसाद उमटले. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निर्णयात विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतींशिवाय इतर कोणाला सहभागी करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

दोनच दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात एका संगीत रजनीचे आयोजन केले होते. याच अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेतील महिला सदस्यांना चांदीच्या ताटात जेवू घातले होते. ही माहिती विधानसभेतच एका महिला सदस्यांनी जाहीर केल्याने सर्वांना कळली होती. त्यामुळेच नार्वेकर यांच्या या संगीत रजनीच्या कार्यक्रमावर काल सर्वत्र जोरदार चर्चा होती. विधान परिषदेतही हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर अनेक सदस्यांची तसेच इतरांची अशी भावना झाली होती की, या संगीत रजनीच्या कार्यक्रमाच्या आयोजनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना डावलण्यात आले. तशा आशयाचे वृत्त आज अनेक माध्यमांतूनही प्रसिद्ध झाले.

नीलम

आज विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे सदस्य आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. आज माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांमुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभेचे सभागृह वरिष्ठ की विधान परिषदेचे सभागृह वरिष्ठ असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये कोणत्यातरी महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला डावलले गेल्याचा विषयही निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर स्पष्टीकरण व्हायला हवे, असे शेलार म्हणाले.

यावर स्पष्टीकरण देताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, दोन्ही सभागृह स्वतंत्रपणे कार्यरत असतात. यामध्ये कोणतेही सभागृह वरिष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. विधानसभेमध्ये कामकाज करताना विधानसभेचे अध्यक्ष कामकाज पाहतात. त्यांच्या अनुपस्थितीत वा त्यांचे पद रिक्त असेल तर हे कामकाज उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांनी नेमलेले तालुकाध्यक्ष पाहतात. तशीच पद्धत विधान परिषदेतही आहे. विधान परिषदेत सभापती कामकाज पाहतात. ते अनुपस्थित असतील किंवा ते पद रिक्त असेल तर तेथील कामकाज उपसभापती किंवा सभापती वा उपसभापतींनी नेमलेल्या तालिका सभापतींनी कामकाज पाहायचे असते. मात्र विधान भवनाशी संबंधित इतर जी कामे असतात याचा निर्णय विधान भवनाचे बोर्ड घेते. या बोर्डात विधानसभेचे अध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती यांचाच  समावेश असतो. या दोघांपैकी जे पद रिक्त असेल तेथे उपाध्यक्ष व उपसभापती यांचा समावेश केला जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा निर्णयात कोणाला विश्वासात घेतले वा डावलले, असा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content