Homeटॉप स्टोरीमंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी!...

मंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी! निवासी डॉक्टरांचा संप मागे!!

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

निवासी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्यांबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १४३२ पदे भरली जातील. डॉक्टरांचे विविध प्रकारचे देणे लवकरात लवकर अदा केले जाईल असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप पुकारण्यापूर्वी आपल्याबरोबर चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. कारण पाच वर्षे आपल्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार चालवण्याची माहिती असल्यामुळे यावर सहज मार्ग निघू शकला असता. परंतु आताही चर्चा होऊन मार्ग निघाला, हे चांगले झाले असेही ते म्हणाले.

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू ठेवावे ही मागणी करतानाच, संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विरोध दर्शवण्यासाठी 16 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता. यावर मार्ग निघाला नाही तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करावी लागेल असा इशारा डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिला होता.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content