Homeटॉप स्टोरीदिशा सालियन चौकशीप्रकरणी...

दिशा सालियन चौकशीप्रकरणी विरोधकांचा मनसुबा फडणवीसांनी उधळला?

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीबाबत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धुळीस मिळवल्याची चर्चा सध्या चालू आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू असून यामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करण्याची घोषणा केली. याकरीता सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार मागणी केली होती. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याला तीव्र विरोध केला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली असून हा मृत्यू अपघाती असल्याचा  निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही. राजकीय हेतूपोटी ही चौकशी केली जात असल्याचा आरोपही विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून केला गेला होता. विरोधकांचा हा आरोप खोडून काढताना फडणवीस यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेलेच नव्हते असे ठासून सांगितले होते.

फडणवीस

शुक्रवारी राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा दिल्लीला पोहोचली होती. या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पोहोचले होते. तेथे माध्यमांशी बोलताना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर सोमवारी विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. दिशा सालियनच्या मृत्यूचे चौकशी सीबीआयने केल्यानंतरही फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल करत हा तपास सीबीआय केलाच नव्हता असे सांगितले. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणाले.

एकीकडे या घडामोडी होत असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात पोहोचले होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर तेथूनच ते दिल्लीला रवाना झाले. ते अचानक का दिल्लीला गेले याबद्दल वेगवेगळी चर्चा केली जात होती. मात्र शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास आम्ही केलाच नसल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण तपासासाठी आपल्याकडे सोपवण्यातच आले नाही. त्याचप्रमाणे आमचा निष्कर्ष म्हणून ज्या काही बातम्या माध्यमे देत आहे किंवा दिल्या आहेत त्या तद्दन खोट्या आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर मौन बाळगणाऱ्या सीबीआयकडून ही भूमिका मांडण्यामागे फडणवीस यांचा दिल्ली दौरा कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content