Homeटॉप स्टोरीतसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद...

तसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावेच लागले असते!

जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ होण्यासारखे काय, असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांना आपण तीन सवाल विचारले होते, ज्याची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते की नाही? शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्यात रस नाही, असे सांगत तुम्हालाच मुख्यमंत्रीपदी राहण्यास सांगितले होते की नाही? मात्र त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाची, हिंदुत्वाची कास धरा, असे सांगितले होते की नाही?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युतीबद्दल चर्चा केली होती आणि येथे भाजपाचे १२ आमदार निलंबित केल्यामुळे पुढची बोलणी थांबली, ही खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली माहिती खोटी आहे का, असे सवाल करत केसरकर यांनी ठाकरे यांना पुन्हा धारेवर धरले.

अडीच वर्षे फक्त राजकारणच केले. राजकारण करण्यालाही मर्यादा असतात. रोज सकाळी नऊ वाजता एकाने उठायचे आणि पत्रकारांसमोर केंद्र सरकारवर टीका करायची. अशाने राज्य चालवता येत नाही. युवा सेनेचे नेते आता जे शाखा-शाखांमधून फिरत आहेत ते अडीच वर्षे कुठे होते? सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय होते. जनतेला भेटण्यासाठीच कार्यालय आणि सरकारी निवासस्थान दिलेले असते. मग या काळात किती वेळा ते कार्यालयात गेले आणि किती जणांना भेटले, असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

तुम्ही आजारी असताना आम्ही कटकारस्थान केले, या आरोपात काहीही तथ्य नाही. आम्ही कारस्थानच केले नाही. जे काही केले ते सांगून, समजावून केले. कार्यकर्ते कसे गोळा करायचे हा तुमचा प्रश्न आहे. पण यात जनतेला ओढू नका. आज खासदारांच्या घरावर मोर्चा काढला जात आहे. अशाने कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो. पोलिसांना बळाचा वापर करणे भाग पडू शकते. तुम्हाला शांतता नको आहे का? हे सर्व थांबले गेले पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा करणाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जाण्याची गरज आहे. खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी, असा सवालही केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content