Homeकल्चर +आकाशवाणी संगीत संमेलनाला...

आकाशवाणी संगीत संमेलनाला पं. भीमसेन जोशींचे नाव!

आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येईल तसेच आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमात ते बोलत होते.  ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संगीतातील अखेरचा शब्द असलेल्या पंडित भीमसेन जोशींनी अनेक तानसेन बनवलेच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांना कानसेनदेखील बनवले. संगीतामध्ये जीवनाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. मोठमोठ्या मैफिली गाजवणारे पंडित भीमसेन जोशी मनाने अत्यंत कोमल होते आणि गरिबातल्या गरिबांसाठीदेखील त्यांनी आपल्या संगीताचा खजिना उपलब्ध करून दिला. परदेशातील मैफिलीमध्ये गाणारे पंडितजी पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या छोट्या मैफिलींमध्येदेखील अत्यंत उत्कटतेने आणि आत्मीयतेने गायचे अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितली.

अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न दिल्याच्या आठवणींनादेखील जावडेकर यांनी यावेळी उजाळा दिला. हा संगीताचा सर्वोच्च सन्मान असून अशा कलाकारांच्या सन्मानामुळे देशाची मान उंचावते असे ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी बोलताना आकाशवाणीने संगीताला घरोघरी नेल्याची आठवण करून दिली आणि दूरदर्शन नसतानादेखील संगीत प्रसारणाची धुरा आकाशवाणीने समर्थपणे सांभाळली असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी संगीताच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताचे व्याकरण शुद्ध ठेवूनदेखील ते लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम केले असे प्रतिपादन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘मोनोग्राम’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्या गायनाने समारंभाची शान वाढवली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप झाला. उद्या या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content