Homeएनसर्कलआयआयटी मुंबईचा 59वा...

आयआयटी मुंबईचा 59वा दीक्षांत सोहळा संपन्न!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी-वास्तव (VR) पद्धतीने साजरा झाला. यासाठी पदवी मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार करण्यात आला होता. एवढेच नाही, तर त्यांना पदवी प्रदान करणारे आयआयटीचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी यांचाही अवतार तयार करण्यात आला होता. सर्व पदकविजेत्यांच्या अवतारांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि टोरंटो विद्यापीठाचे प्रोफेसर जेफ्री हिंटन यांच्या हस्ते पदके मिळाली.

सर्व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, अशाप्रकारे दीक्षांत समारंभ घेणे योग्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थेतून पदवीधर झाल्याचा क्षण अभिमानाने साजरा करता येईल आणि त्यांच्या आरोग्यालाही धोका असणार नाही.

गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही या संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना आभासी अवतार स्वरूपात येण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी याला आभासी अवतारांच्या रूपाने, संस्थेचा परिसर, आपले हॉस्टेल आणि विभागातही फेरफटका मारला. तसेच आपले मित्र आणि प्राध्यापकांचीही भेट घेतली. याशिवाय, काही विद्यार्थ्यांना या समारंभात प्रत्यक्ष पदवीही देण्यात आली.

आजच्या 59व्या दीक्षांत समारंभात, एकूण 2501 पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात 178 पीएचडी, 36 एमटेक/एमफील आणि पीएचडी, 26 दुहेरी पदवी, (एमएससी, पीएचडी), 8 एमएस, 689 एमटेक, 63 एमडी, 18 दुहेरी पदवी (बीडीएस+एमडी), 13 एमफील, 109 एमबीए, 1 इईमबीए, 7 एमपीपी, 235 दोन वर्षे एमएससी, 324 दुहेरी पदवी (बीटेक+एमटेक), 663 बी टेक पदव्या, 12 आंतरशाखीय दुहेरी पदवी (बीटेक/बीएस +एमटेक/एमएससी), 8 दुहेरी पदवी (बीएस+एमएससी), 49 बीएस, 14 बीडी, 20 पीडीजीआयआटी यासह 28 संयुक्त पीएचडी देण्यात आल्या.

यावर्षी, 38 संशोधन स्कॉलरची नाईक आणि रस्तोगी पीएचडी उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदकांनी गौरवण्यात आले. प्रेसिडेंट ऑफ इंडिया पुरस्कार, सिद्धार्थ चांडक बी टेकच्या विद्यार्थ्याला देण्यात आला. ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ आणि डॉ शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक, मनु श्रीवास्तव या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याने जिंकली. त्याशिवाय, विविध विभागांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करताना संचालक प्रा. सुभाशिष चौधरी म्हणाले की, आजही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थांची आयआयटी मुंबईलाचा सर्वाधिक पसंती असते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेफ्री हिंटन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कठीण परिस्थितीतदेखील या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात, अत्यंत वेगाने होणारी प्रगती, समाजात आपल्या आकलनापलीकडचे परिवर्तन घडवून आणणार असून त्याचे सगळेच परिणाम चांगले असतील असे नाही, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण येणाऱ्या वैद्यकीय क्रांतीत सहभागी होण्यास उत्सुक असतील, ज्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला मानवतेचे कल्याण करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रो. जेफ्री हिंटन यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्क्सचे जनक म्हणून ओळखले जातात. सध्या ते टोरांटो विद्यापीठात प्राध्यापक आणि व्हेक्टर विद्यापीठात प्रमुख वैज्ञानिक सल्लागार तसच गुगलमध्ये अभियांत्रिकी फेलो अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

Continue reading

काही राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम

देशातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका बाजूला चक्रीय चक्रवातामुळे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात 'अँटी-सायक्लोनिक' स्थितीमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या...

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...
Skip to content