Homeन्यूज अँड व्ह्यूज१० वर्षांत परदेशांतून...

१० वर्षांत परदेशांतून आणलेल्या ३१ कलाकृती तामिळनाडूतील!

जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते. आणि त्या कलाकृती परत आणण्याकरीता प्रयत्न केले जातात. गेल्या दहा वर्षांत परदेशातून जप्त करण्यात आलेल्या पुरातन कलाकृतींपैकी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेतून जप्त करण्यात आलेल्या 31 पुरातन कलाकृती तामिळनाडूतील आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

राज्याच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या भारतीय पुरातन कलाकृती पुन्हा देशात आणल्या जात आहेत. जेव्हा एखाद्या पुरातन कलाकृतींच्या चोरीची तक्रार केली जाते, तेव्हा संबंधित पोलीसठाण्यात एफआयआर दाखल केला जातो आणि चोरी झालेल्या पुरातन कलाकृतींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची बेकायदेशीर निर्यात रोखण्याच्या दृष्टीने दक्ष राहण्यासाठी सीमा निर्गमन मार्गासह कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना ‘लूक आउट नोटीस’ जारी केली जाते. पुरातन कलाकृती सापडल्यास, त्या परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) समन्वयाने संबंधित कायदा अंमलबजावणी आंस्थेद्वारे प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो.

भारतातून घेऊन गेलेल्या मूळ भारतीय पुरातन कलाकृती परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एएसआय ने 1976 ते 2023 या कालावधीत परदेशातील 357 पुरातन कलाकृती परत आणल्या आहेत, त्यापैकी 2014 पासून 344 पुरातन कलाकृती परत मिळवल्या आहेत.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content