Homeन्यूज अँड व्ह्यूज१० वर्षांत परदेशांतून...

१० वर्षांत परदेशांतून आणलेल्या ३१ कलाकृती तामिळनाडूतील!

जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते. आणि त्या कलाकृती परत आणण्याकरीता प्रयत्न केले जातात. गेल्या दहा वर्षांत परदेशातून जप्त करण्यात आलेल्या पुरातन कलाकृतींपैकी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेतून जप्त करण्यात आलेल्या 31 पुरातन कलाकृती तामिळनाडूतील आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

राज्याच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या भारतीय पुरातन कलाकृती पुन्हा देशात आणल्या जात आहेत. जेव्हा एखाद्या पुरातन कलाकृतींच्या चोरीची तक्रार केली जाते, तेव्हा संबंधित पोलीसठाण्यात एफआयआर दाखल केला जातो आणि चोरी झालेल्या पुरातन कलाकृतींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची बेकायदेशीर निर्यात रोखण्याच्या दृष्टीने दक्ष राहण्यासाठी सीमा निर्गमन मार्गासह कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना ‘लूक आउट नोटीस’ जारी केली जाते. पुरातन कलाकृती सापडल्यास, त्या परत आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) समन्वयाने संबंधित कायदा अंमलबजावणी आंस्थेद्वारे प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो.

भारतातून घेऊन गेलेल्या मूळ भारतीय पुरातन कलाकृती परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. एएसआय ने 1976 ते 2023 या कालावधीत परदेशातील 357 पुरातन कलाकृती परत आणल्या आहेत, त्यापैकी 2014 पासून 344 पुरातन कलाकृती परत मिळवल्या आहेत.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content