Homeकल्चर +'इंद्रायणी'चे ३०० भाग...

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!


कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बऱ्याच घटना बघायला मिळाल्या आहेत. इंदूचा संघर्षमय प्रवास.. त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं. या मालिकेने ३०० भागांचा पल्ला गाठला आहे.

दुसरीकडे, आपल्याला विठूच्या वाडीत इंदू आणि फँटया गॅंग बरीच धम्माल मस्ती करतानादेखील दिसतात. मालिकेमध्ये इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला आणि इंदू आनंदीच्या विळख्यात अजूनच अडकत गेली. इंदूचा आजवर दु:स्वास करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले. इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांनादेखील महाराजांना कळले. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत हे खूपच चुकीचं आहे हेदेखील समजविण्याचा प्रयत्न व्यंकू महाराज करताना दिसून आले. आता आंनदीबाईंचा खरा चेहरा व्यंकू महाराज इंदूच्या समोर आणू शकतील? इंदूचा यावर विश्वास बसेल? हे बघणे रंजक असणार आहे.

व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला की, इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत याचा खूप आनंद आहे. याआधी जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये मी चोळप्पाचे पात्र साकारले होते आणि आता मला व्यंकू महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये काम करत असताना मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. चोळप्पाची व्यक्तिरेखा साकारणे आणि आता व्यंकू महाराजांची भूमिका करणे या दोन्हींमध्ये खूप फरक होता. कारण चोळप्पाच्या व्यक्तिरेखेला एक ऐतिहासिक बाज, संदर्भ होता. पण, व्यंकू महाराजांच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. महत्त्वाचे म्हणजे वारकरी कीर्तन वा अभंग किंवा एकंदरीतच वारकरी सांप्रदाय याच्याशी खूप जवळून संबंध ही भूमिका साकारताना आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानग्या इंदूसोबत काम करताना आणि एका वेगळ्याच भाषेच्या लहेजामध्ये काम करताना खरंच खूप मजा आली. मालिकेचे ३०० भाग कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही. मालिकेतल्या सगळ्या लहान मुलांसोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंदाचा आणि खूप काही शिकवून जाणारा भाग होता. संपूर्ण टीमने केलेल्या उत्तम सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडतेय.. त्याची पावती मिळतेय हीदेखील माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.

Continue reading

‘तिसऱ्या मुंबई’ची दावोसमध्ये मुहूर्तमेढ! रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा!!

मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य...

‘वंदे भारत’च्या स्लीपर ट्रेनला उदंड प्रतिसाद, हातोहात तिकिटे बूक!

वंदे भारत स्लीपर ट्रेन (गाडी क्रमांक 27576)च्या कामाख्या (केवायक्यू) आणि हावडा (एचडब्ल्यूएच)दरम्यानच्या पहिल्या व्यावसायिक फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पीआरएस आणि इतर साईट्सद्वारे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही तासांतच गाडीतल्या सर्व जागा आरक्षित झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

विनोद तावडे भाजपाचे केरळचे निवडणूक प्रभारी!

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काल सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच नितीन नबीन यांनी ही घोषणा केली. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे केरळमध्ये...
Skip to content