Homeबॅक पेजअज्ञानामुळे गेलेले ३...

अज्ञानामुळे गेलेले ३ लाख पोलिसांमुळे मिळाले परत!

अज्ञानामुळे झालेल्या चुकीमुळे तीन लाखांना फसविल्या गेलेल्या एका व्यक्तीला मुंबईतल्या दहिसर पोलिसांनी त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी. अभय नवीनचंद्र कामानी (वय 42 वर्षं) नावाची नोकरदार व्यक्ती दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनीत राहतात. कामानी 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या दोन मुलींना बोरीवलीच्या मेरी मॅक्युलेट हायस्कूल शाळेत सोडून येत असताना त्यांच्या मोबाईल फोनवर आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्ड व्हिडिओ केवायसी अपडेट करण्यासाठी एक संदेश प्राप्त झाला होता. तो तक्रारदार कामानी यांनी उघडून पाहिला असता त्यांना त्यामध्ये एक लिंक दिसली. त्यावर त्यांनी क्लिक करत असताना त्यांना मोबाईल क्रमांक 9883681241 यावरून कॉल आला. तो कामानी यांनी उचलला असता ‘मी आयसीआयसीआय बँकेकडून बोलत आहे. तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर जो संदेश प्राप्त झाला, त्यावर जाऊन क्लिक करा..’ असे सांगितले.

त्यानंतर कामानी यांनी नमूद संदेशामधील लिंकवर क्लिक केले असता तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर एका पाठीमागे एक असे 05 ते 10 ओटीपी संदेश प्राप्त झाले. त्यानंतर थोड्या वेळात त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 65,490 रू. कट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. नंतर एका पाठीमागे एक असे 19,560 रू, 84,145 रू, 49,999 रू, 83,997रू, असे एकूण 3,03,194 रू त्यांच्या क्रेडिट कार्डमधून कपात झाले. कामानी यांना वरील रक्कम डेबिट झाल्याचा संदेश मिळताच, त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ दहिसर पोलीस ठाण्यातील सायबर सेल येथे उपनिरीक्षक गुहाडे यांच्याकडे तक्रार केली.

पोलिसांनी तक्रारदाराच्या गेलेल्या रक्कमेचा शोध घेतला असता त्यांची रक्कम

1) REALME MOBILE- 83,997 रू,

2) ONE PLUS 49,999 रू, 

3) INFINITY RETAIL 65,490 रू,

4) MOBIKWIK 19,560 रू,

5) OPPO MOBILES 84,148 रू, 

येथे गेल्याचे समजले. त्यानंतर उपनिरीक्षक गुहाडे यांनी वरील कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांना  मेलद्वारे व मोबाईलवर संपर्क करून फॉलोअप घेऊन तक्रारदाराचे 3,03,194/- त्यांना परत मिळवून दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त (परिमंडळ- 12) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (दहिसर विभाग) किशोर गायके, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राम पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांच्या पथकाने हा तपास केला.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content