Homeएनसर्कलमहामार्गांच्या भूसंपादनाचे 1467...

महामार्गांच्या भूसंपादनाचे 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टलखाली!

भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच भूसंपादनाची नुकसानभरपाई देण्यासाठी, भूसंपादनाच्या अधिसूचनांच्या ऑनलाईन प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्म वर करता याव्यात, यासाठी भूमी राशी पोर्टल तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टल अंतर्गत आणण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2018 पासून, भूसंपादनाशी संबंधित सर्व प्रस्ताव या पोर्टलवरुन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भूसंपादनासाठी, सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या राज्य सरकारच्या संबंधित महसूल अधिकाऱ्याद्वारे सर्व भूसंपादनाच्या सूचना ऑनलाईन सादर केल्या जातात आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मान्यतेनंतर त्या ई-राजपत्राद्वारे भारत सरकारच्या प्रसारमाध्यमांना ऑनलाईन पाठवल्या जातात. भूसंपादनाची नुकसानभरपाईही भूमी राशी पोर्टलद्वारे दिली जात आहे. पोर्टलमुळे अधिसूचना जारी करण्याचा कालावधी कमी झाला असून, संपूर्ण प्रक्रियेत कार्यक्षमता तसेच पारदर्शकता आणली आहे.

या प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://bhoomirashi.gov.in/auth/revamp/search_proj.cshtml 

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content