Homeबॅक पेजयंदा हज यात्रेकरूंसाठी...

यंदा हज यात्रेकरूंसाठी 1,40,020 जागा राखीव!

हज 2024साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल, तर  35,005 यात्रेकरूंना हज समुहाच्या परिचालकांद्वारे हजयात्रा करण्याची परवानगी दिली जाईल.

केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  स्मृती इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री  व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024वर नुकतीच स्वाक्षरी केली.

लेडीज विदाऊट मेहरम (LWM) श्रेणी  अंतर्गत सहभागास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राबवलेल्या उपक्रमाची यावेळी  चर्चा झाली, तसेच या उपक्रमाचे मनापासून  कौतुक करत वाहवा केली गेली. द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आणि सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर,स्मृती इराणी यांच्यासोबत मुरलीधरन यांनी, जेद्दाहच्या किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हज टर्मिनलला भेट दिली. हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि भारतीय हज यात्रेकरुंच्या सोयीसाठी उत्तम मालवाहतूक तसेच देखरेख यंत्रणा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही भेट होती.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content