Homeटॉप स्टोरीदोन वर्षांत कोकणातील...

दोन वर्षांत कोकणातील 10 कृषी महाविद्यालये बंद!

बीएससी कृषी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांपेक्षा, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञानातील तीन बीटेक कार्यक्रमांसह संलग्न कार्यक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत कोकणातली किमान 10 कृषी महाविद्यालये बंद झाली आहेत, ज्यामध्ये 15 पैकी सहा कृषी अभियांत्रिकी संस्थांचा समावेश आहे, एक फलोत्पादन, एक बायोटेक, एक अन्न तंत्रज्ञान आणि एक एबीएम कॉलेज आहे.

अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी ही बातमी आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, शेतकरी सन्मान योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे नव्या पिढीतील, नव्या दृष्टीने तरुण शेतकरी घडविणारी प्रक्रिया धोक्यात आली आहे. राज्यातील कृषी अभ्यासक्रमांमधील प्रवेश संकटात आले आहेत. 10 महाविद्यालये बंद पडली असून 44 संस्थांमध्ये अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

खाजगी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक

सरकारी डेटावरून मागणी-पुरवठा विसंगती विविध महाविद्यालयांवर कसा परिणाम करते, यात स्पष्ट तफावत दिसून येते. चार राज्य कृषी विद्यापीठांमधील 198 पैकी 86 महाविद्यालयात या वर्षी त्यांच्या सर्व पदवीपूर्व जागा भरल्या गेल्या. 44 संस्थांमध्ये मात्र चिंताजनक स्थिती आहे. तिथे 50% किंवा त्याहून अधिक रिक्त जागांची नोंद झाली आहे. खाजगी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे, त्यापैकी फक्त एक तृतीयांश, 151पैकी 54ने शंभर टक्के प्रवेश नोंदवले आहेत. तीन खाजगी कृषी अभियांत्रिकीसह सहा संस्था या वर्षी एकही विद्यार्थी मिळवू शकले नाहीत.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर, बीटेक: 50% जागा रिक्त

चालू शैक्षणिक वर्षासाठी नऊ पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत संपत आली, तेव्हा उपलब्ध 16,829 जागांपैकी पैकी 13,897 म्हणजे जवळजवळ 82% जागा भरल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही सुधारणा असली तरी, एकेकाळी 2017-18मध्ये, 15,000पैकी जवळजवळ सर्व जागांवर प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांनी दावा केला होता.

सरकारी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाणही चिंताजनक

47 सरकारी संस्थांपैकी 15 संस्थांमध्येही सर्व जागा भरण्यात अपयश आले. ज्या सरकारी संस्थांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण चिंताजनकपणे जास्त आहे, त्यातील बहुतांश मराठवाड्यातील आहेत. बीड जिल्ह्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) महाविद्यालयात 77% जागा रिक्त आहेत. परभणी येथील राज्यातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय 58% जागा शिल्लक राहिल्या आहेत.

कोकण कृषी विद्यापीठात सर्वात कमी प्रवेश

राज्यभरात रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असताना, दापोली (रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (बीएसकेकेव्ही) घटक आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये सर्वात कमी प्रवेश नोंदवले गेले आहेत. विद्यापीठाच्या 25 महाविद्यालयांमधील 2,023 पदवीपूर्व जागांपैकी फक्त 57% जागा भरल्या गेल्या आहेत. बीएसकेकेव्हीचे प्रादेशिक अधिकारक्षेत्र राज्याच्या किनारपट्टीवरील सहा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

Continue reading

मलेरियावर नवजात बालकांसाठी जगातले पहिले औषध दृष्टीक्षेपात

जागतिक आरोग्य संघटना (हू-डब्ल्यूएचओ) ने 'कोआर्टेम बेबी' या औषधाला 'प्री-क्वालिफिकेशन' बहाल केले आहे. २ ते ५ किलोग्रॅम वजनाच्या नवजात बालकांसाठी विकसित केलेले हे जगातील पहिले आणि एकमेव मलेरिया प्रतिबंधक औषध ठरले आहे. या निर्णयामुळे आता जगभरातील सरकारी यंत्रणांना या...

जागतिक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे फिरवणार पाठ?

जागतिक ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने भारतीय इक्विटी मार्केटला 'न्यूट्रल'वरून 'अंडरवेट' श्रेणीत ढकलले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जागतिक गुंतवणूकदारांनी आता भारतीय शेअर बाजारात आपली गुंतवणूक कमी करावी, असा सल्ला या संस्थेने दिला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील अनपेक्षित वाढ हे यामागचे...

सावधान! सर्रास घेतली जाणारी ‘पेनकिलर’ ठरू शकतात विष!!

आपल्याला थोडं जरी डोकं दुखलं, अंगदुखी जाणवली किंवा ताप आला की आपण लगेच घरच्या कपाटातील किंवा जवळच्या मेडिकल स्टोअरमधून एखादी 'पेनकिलर' घेतो. ही औषधं तात्पुरता आराम देत असली तरी, त्यांचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीचे सेवन जीवघेणे ठरू शकते. एका...
Skip to content