HomeArchive२०२२च्या आधी तयार...

२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

Details
२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.
 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
“ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.”

 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
“समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content