HomeArchiveहिंदी साहित्य अकादमीचे...

हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत!

Details
हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे. म्हणूनच ही कला राजाश्रीत नाही तर राजपुरस्कृत होणे आवश्यक असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सांगितले. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास या कलांचे श्रेष्ठत्व वाढून नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यात तावडे बोलत होते. राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २०१७-१८ या वर्षातील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी तावडे यांच्यासह हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे, हिंदी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष नंदलाल पाठक, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र, कर्नल लेफ्टनंट मनोजकुमार सिन्हा, आमदार मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी साहित्य अकादमीमार्फत तीन प्रकारचे पुरस्कार दिले गेले. यामध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार तसेच २० विधा पुरस्कार अश्या एकूण ३० पुरस्कारांचा समावेश होता.

 

तावडे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

यावर्षी ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारांमध्ये ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रंगनाथ तिवारी आणि डॉ. ‘राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रामेश्वरनाथ मिश्र ‘अनुरोध’ यांना प्रदान करण्यात आला.

 

‘राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार’ पुरस्कारांतर्गत ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ प्रेम शुक्ल, ‘साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ मंजु लोढा, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. तेजपाल चौधरी, ‘डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’ पूजाश्री, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ सुधीर ओखदे, ‘कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ माणिक बाबुराव मुंडे, ‘व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. विनोद नारायण इंदुरकर, ‘सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. श्रीभगवान तिवारी यांना प्रदान करण्यात आला.

‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार’ शीतला पांडेय-समीर ‘अनजान’ यांना स्वर्ण, सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशी वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात आला. ‘वैज्ञानिक तकनीकी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार’ मुकेश ग. पंडया यांना देण्यात आला आहे.

 

‘हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन’ या विधासाठी देण्यात येणारा ‘पं. महावीर प्रसाद व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात आला. ‘नाटक’ या विधासाठी देण्यात येणारा ‘विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार’ डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात आला. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘काका कालेलकर रजत पुरस्कार’ डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात आला. ‘पत्रकारिता-कला’ या विधासाठी देण्यात येणारा ‘बाबुराव विष्णु पराडकर कांस्य पुरस्कार’ अनूप श्रीवास्तव यांना, तर ‘लोकसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार’ निर्मला डोसी यांना देण्यात आला. ‘बालसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ नीलम सक्सेना ‘चंद्रा’ यांना देण्यात आला.

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख, ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख असे आहे. विधा पुरस्कार स्वर्ण, रजत, कांस्य अश्या तीन प्रकारात अनुक्रमे ३५ हजार रूपये, २५ हजार रूपये आणि ११ हजार रूपये अशा स्वरूपात देण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी आहे. म्हणूनच ही कला राजाश्रीत नाही तर राजपुरस्कृत होणे आवश्यक असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सांगितले. कला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिल्यास या कलांचे श्रेष्ठत्व वाढून नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यात तावडे बोलत होते. राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २०१७-१८ या वर्षातील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी तावडे यांच्यासह हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे, हिंदी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष नंदलाल पाठक, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र, कर्नल लेफ्टनंट मनोजकुमार सिन्हा, आमदार मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी साहित्य अकादमीमार्फत तीन प्रकारचे पुरस्कार दिले गेले. यामध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार तसेच २० विधा पुरस्कार अश्या एकूण ३० पुरस्कारांचा समावेश होता.

 

तावडे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

यावर्षी ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारांमध्ये ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रंगनाथ तिवारी आणि डॉ. ‘राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ रामेश्वरनाथ मिश्र ‘अनुरोध’ यांना प्रदान करण्यात आला.

 

‘राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार’ पुरस्कारांतर्गत ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ प्रेम शुक्ल, ‘साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ मंजु लोढा, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. तेजपाल चौधरी, ‘डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’ पूजाश्री, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ सुधीर ओखदे, ‘कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ माणिक बाबुराव मुंडे, ‘व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. विनोद नारायण इंदुरकर, ‘सुब्रमण्य भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. श्रीभगवान तिवारी यांना प्रदान करण्यात आला.

‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार’ शीतला पांडेय-समीर ‘अनजान’ यांना स्वर्ण, सुधा राठौर यांना रजत तसेच डॉ मुकेश गौतम यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ मंजुला जोशी यांना स्वर्ण, कृष्ण नागपाल यांना रजत, तसेच डॉ. शशी वर्धन शर्मा-(शैलेश) यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ प्रभा मेहता यांना स्वर्ण, शिव प्रसाद तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. मजीद शेख यांना स्वर्ण, डॉ. पंडित बन्ने यांना रजत, डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ कुमुद संघवी चावरे यांना स्वर्ण व रासबिहारी पाण्डेय यांना रजत पुरस्कार देण्यात आला. ‘वैज्ञानिक तकनीकी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार’ मुकेश ग. पंडया यांना देण्यात आला आहे.

 

‘हिंदी भाषा, भाषा शास्त्र तथा व्याकरण संबंधी लेखन’ या विधासाठी देण्यात येणारा ‘पं. महावीर प्रसाद व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ डॉ. दिनेश प्रताप सिंह यांना देण्यात आला. ‘नाटक’ या विधासाठी देण्यात येणारा ‘विष्णुदास भावे स्वर्ण पुरस्कार’ डॉ. मधुकर राठोड यांना देण्यात आला. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘काका कालेलकर रजत पुरस्कार’ डॉ. जितेन्द्र पाण्डेय यांना देण्यात आला. ‘पत्रकारिता-कला’ या विधासाठी देण्यात येणारा ‘बाबुराव विष्णु पराडकर कांस्य पुरस्कार’ अनूप श्रीवास्तव यांना, तर ‘लोकसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘फणीश्वरनाथ रेणू स्वर्ण पुरस्कार’ निर्मला डोसी यांना देण्यात आला. ‘बालसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल व्दिवेदी कांस्य पुरस्कार’ नीलम सक्सेना ‘चंद्रा’ यांना देण्यात आला.

सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते. ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख, ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख असे आहे. विधा पुरस्कार स्वर्ण, रजत, कांस्य अश्या तीन प्रकारात अनुक्रमे ३५ हजार रूपये, २५ हजार रूपये आणि ११ हजार रूपये अशा स्वरूपात देण्यात आला.”
 
 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content