HomeArchiveहाजी अलीला उड्डाणपूल...

हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

Details
हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content