HomeArchiveहाजी अलीला उड्डाणपूल...

हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

Details
हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content