HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकारच्या...

स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

Details
स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०१९ या दिवशी पाचवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात तरूण कोल्हापूर येथे १२ वर्षीय पार्थ कांबळे तर मुंबई केंद्रावर १४ वर्षीय जिष्णू बांदोडकर तसेच सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षीय रमेश वाघ, मुंबई तर ८१ वर्षाचे पांडुरंग गुजर, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदवला.

 

जिष्णू बांदोडकर आणि त्याची माता राजश्री बांदोडकर यांनी सलग पाचव्या वर्षी उपस्थिती नोंदवली. नाशिकमध्ये सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरीक मोठ्या उस्ताहाने सहभागी झाले. अहमदनगर शहरामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी आणि नाष्ट्याची विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. मुंबई आणि अहमदनगर या केन्द्रांवर काही स्पर्धकांनी सलग पाचव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, डहाणू अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, बीड, उस्मानाबाद येथून स्पर्धक कोल्हापूर केन्द्रावर पोहोचले होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहारांचा समावेश यात केला जाईल असे सांगितले. विलास कडू, सुहास पटवर्धन, गंगाराम बाईत, मिलिंद रहाटे आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०१९ या दिवशी पाचवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात तरूण कोल्हापूर येथे १२ वर्षीय पार्थ कांबळे तर मुंबई केंद्रावर १४ वर्षीय जिष्णू बांदोडकर तसेच सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षीय रमेश वाघ, मुंबई तर ८१ वर्षाचे पांडुरंग गुजर, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदवला.

 

जिष्णू बांदोडकर आणि त्याची माता राजश्री बांदोडकर यांनी सलग पाचव्या वर्षी उपस्थिती नोंदवली. नाशिकमध्ये सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरीक मोठ्या उस्ताहाने सहभागी झाले. अहमदनगर शहरामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी आणि नाष्ट्याची विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. मुंबई आणि अहमदनगर या केन्द्रांवर काही स्पर्धकांनी सलग पाचव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, डहाणू अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, बीड, उस्मानाबाद येथून स्पर्धक कोल्हापूर केन्द्रावर पोहोचले होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहारांचा समावेश यात केला जाईल असे सांगितले. विलास कडू, सुहास पटवर्धन, गंगाराम बाईत, मिलिंद रहाटे आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content