HomeArchiveसौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना...

सौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण!

Details
सौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!” या जीवन विद्या मिशनचे संस्थापक व प्रणेते सद्गुरु डॉ. वामनराव पै यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वप्रार्थनेच्या एक भव्य सौरऊर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारलेल्या फलकाचे अनावरण एका शानदार आणि भावभक्तीमय वातावरणात जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते करण्यात आले.

बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या मुख्य प्रवेशद्वारी उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील विश्वप्रार्थनेच्या फलक अनावरण समारंभाला प्रल्हाददादा पै यांचे नातू कुमार यश पै आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘पर्यावरण हाच नारायण’ हा विचार प्रत्यक्षात साकारणाऱ्या या विश्वप्रार्थना फलकाची प्रकाशयोजना सौरऊर्जेवर आधारित आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ही विश्व प्रार्थना सर्वांच्या मुखात यावी, हा उदात्त हेतू हा फलक उभारण्यामागे आहे. यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे व नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसुंगे, नगरसेवक संजय घाडी यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात विश्व प्रार्थनेने केली. हे उत्तम, पवित्र कार्य करावयास मिळाले यासाठी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर प्रल्हाददादा पै यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यावरणाचे रक्षण व्हावे व पर्यावरणातील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. ही विश्वप्रार्थना सर्वांसाठी म्हटल्याने सर्वात प्रथम आपले भले होते. कारण सर्वांमध्ये आपण असतो. म्हणून ही प्रार्थना सतत म्हटली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास जीवन विद्या मिशनचे विश्वस्त गिरीश कलव, संतोष सावंत, तुषार राणे तसेच अनेक नामधारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी अनंत साठे, रमेश चव्हाण, तुषार खानोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद राणे यांनी केले. प्रल्हाददादा यांनी स्वतः तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्व उपस्थितांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!” या जीवन विद्या मिशनचे संस्थापक व प्रणेते सद्गुरु डॉ. वामनराव पै यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वप्रार्थनेच्या एक भव्य सौरऊर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारलेल्या फलकाचे अनावरण एका शानदार आणि भावभक्तीमय वातावरणात जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते करण्यात आले.

बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या मुख्य प्रवेशद्वारी उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील विश्वप्रार्थनेच्या फलक अनावरण समारंभाला प्रल्हाददादा पै यांचे नातू कुमार यश पै आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘पर्यावरण हाच नारायण’ हा विचार प्रत्यक्षात साकारणाऱ्या या विश्वप्रार्थना फलकाची प्रकाशयोजना सौरऊर्जेवर आधारित आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ही विश्व प्रार्थना सर्वांच्या मुखात यावी, हा उदात्त हेतू हा फलक उभारण्यामागे आहे. यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे व नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसुंगे, नगरसेवक संजय घाडी यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात विश्व प्रार्थनेने केली. हे उत्तम, पवित्र कार्य करावयास मिळाले यासाठी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर प्रल्हाददादा पै यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यावरणाचे रक्षण व्हावे व पर्यावरणातील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. ही विश्वप्रार्थना सर्वांसाठी म्हटल्याने सर्वात प्रथम आपले भले होते. कारण सर्वांमध्ये आपण असतो. म्हणून ही प्रार्थना सतत म्हटली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास जीवन विद्या मिशनचे विश्वस्त गिरीश कलव, संतोष सावंत, तुषार राणे तसेच अनेक नामधारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी अनंत साठे, रमेश चव्हाण, तुषार खानोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद राणे यांनी केले. प्रल्हाददादा यांनी स्वतः तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्व उपस्थितांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.”

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content