HomeArchiveसरकारी नोकरीच्या मागणीत...

सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ!

Details

 
“नॉनमेट्रो शहरांतून ६६ टक्के तर मेट्रोंमधून ३४ टक्के मागणी
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
कोरोना व्हायरस उद्रेकाचा सर्वाधिक फटका देशातील खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत तर अनेकांना कमी पगारात आपले घर चालवावे लागत आहे. परिस्थितीत अजूनही विशेष सुधारणा न झाल्याने असंख्य कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. परिणामी नोकरीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
 

 
 
अड्डा२४७, या देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंचाने ‘महामारीच्या काळात सरकारी नोकऱ्यांची स्थिती’ जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. सर्वेक्षणात सामील सुमारे ६५०० नोकरीइच्छूक उमेदवारांपैकी ८२.३३ टक्के उमेदवारांनी खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्याला आपले प्राधान्य असल्याचे नमूद केले. 
 
सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणीही नॉन मेट्रो शहरांतून होत आहे. चांगली नोकरी मिळण्याच्या आशेने नॉन मेट्रो शहरातील लोक नेहमीच महानगरांत स्थलांतरण करीत असतात. परंतु बहुतांश नोकरदार कोरोनाच्या प्रभावानंतर आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळेच या भागांतून सर्वाधिक म्हणजेच ६६ टक्के मागणी होत आहे तर मेट्रो शहरांतून ३४ टक्के लोकांनी सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे. दिल्लीत सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणी ११.०४% इतकी नोंदवली गेली तर पाटण्यासारख्या नॉनमेट्रो शहरातूनदेखील ११.०३% इतकी मागणी नोंदवली गेली. सर्वेक्षणात सामील ८२.३३ टक्के लोकांनी सुरक्षितता म्हणून सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे तर ५ टक्के लोकांनी सरकारी नोकरीत मिळणारा पगार तर २.७७ टक्के लोकांनी या नोकरीत मिळणारे इतर लाभ मिळण्याच्या आशेने आपला कल दर्शविला आहे.
 

 
 
अड्डा२४७चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागर म्हणाले की, लॉकडाउननंतर ज्या घटना घडल्या अशा विविध घडामोडींचे मूल्यांकन करणे हा या सर्वसमावेशक संशोधनाचा मुख्य हेतू होता. विविध व्यवसायांची सेवा आणि संचालन बंद झाल्याने कामगार वर्गात कधीही नोकरी जाईल अशी भीती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच सरकारी नोकरीच्या मागणीतील वाढ दिसून आली आहे. खाजगी क्षेत्रात काम करताना संकटसमयी नोकरी जाण्याची असलेली भीती आणि अशा परिस्थितीही सरकारी नोकरीत मिळणारी सुरक्षितता हेच मूळ कारण आहे, ज्यामुळे आज बहुतांश लोक सरकारी नोकरीकडे पुन्हा वाळू लागले आहेत.
 ”
 

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content