HomeArchiveसकस मनोरंजनाला प्राधान्य...

सकस मनोरंजनाला प्राधान्य द्या – डॉ. मोहन आगाशे!

Details
सकस मनोरंजनाला प्राधान्य द्या – डॉ. मोहन आगाशे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप
जंक फुड टाळून आपण सकस अन्न खाल्लं पाहिजे. तसंच दर्जेदार मनोरंजनाकडे आपण वळलं पाहिजे. आज मोबाईलच्या जमान्यात माणूस एकटा पडत चाललाय. थिएटरमधे न जाता तो मोबाईलवर सिनेमा बघतोय. उंदराने लेंड्या टाकाव्यात तसा तो सगळीकडे फोटो टाकत सुटलाय. एखादी गोष्ट तो डोळ्यांनी पाहायची विसरून गेलाय. हे चुकीचं आहे. आज बायोपिक बनवले जाताना नको तेवढी तथाकथित सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते. मग तो बायोपिक तरी कसा म्हणायचा, असं परखड मत प्रख्यात अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी कोहापुरात व्यक्त केलं. मी माझं म्हणणं मांडत असताना कदाचित मला थांबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.

 

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या (kiff) समारोप प्रसंगी ते बोलत होते. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूरला आयनॉक्समधे kiff सुरू होता. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हे आयोजक होते. च्रंद्रकांत जोशी आणि दिलीप बापट यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांना दर्जेदार सिनेमांची मेजवानी मिळाली. परवा या फेस्टीवलचा समारोप आणि मराठी सिनेमांच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले.

 

दि. बा. मोकाशींच्या आमोद सुनियासी आले, या कथेवर आधारित ‘दिठी’ हा पावसाचा आणि अध्यात्माचा विलक्षण अनुभव देणाऱ्या सुमित्रा भावे दिग्दिर्शीत चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर प्रेक्षक पसंतीचा आणि सर्वोत्कृष्ट दिगृदर्शनाचा पुरस्कार कोल्हापूरची निर्मिती असलेल्या इमॅगो या तरल भावस्पर्शी सिनेमाला मिळाला. लेखक दिग्दर्शक करण चव्हाण आणि विक्रम पाटील. हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाने बघितलाच पाहिजे.

 

‘म्होरक्या’ या अफलातून सिनेमाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. लेखक दिग्दर्शक अमोल भारत देवकर. बार्शी ह्या दुष्काळी भागात चित्रित झालेला हा सिनेमा अजब आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणारे हे तिन्ही सिनेमे बघणं प्रेक्षकांना कंपलसरी आहे. सिनेमाचे बारकावे टिपता यावेत म्हणून यंदापासून हा महोत्सव आयनॉक्समधे आपण घेत आहोत असं चंद्रकांत जोशी यांनी सांगितलं तर सिनेमा म्हणजे आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे, ठेव आहे. म्हणून सिनेमा प्रामाणिकपणे केला पाहिजे असं सुमित्रा भावे यांनी सांगितलं. बाबुराव पेंटर पुरस्कारविजेते संकलक अमोल देशपांडे यांनीही आपलं मनोगत अत्यंत थोडक्यात एडिट करून कथन केलं. विजय तेंडुलकरना आपण शेवटच्या काळात भेटायला गेलो होतो, तेव्हा मी संकलक आहे असं कळताच ‘भागतं का’ असं त्यांनी विचारलं होतं. छोटी-मोठी कामं मिळतात. त्यामुळे भागतं असं म्हटल्यावर आणि नाही असं म्हणूपण नकोस, असं त्यांनी सांगितल्याची एक हळवी आठवण त्यांनी सांगितली. सर्व पुरस्कारविजेत्यांनी आपली मनोगत दोन-दोन मिनिटांत नेमकेपणाने व्यक्त केली. त्यामुळे समारोपाचा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला.”
 
“डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप
जंक फुड टाळून आपण सकस अन्न खाल्लं पाहिजे. तसंच दर्जेदार मनोरंजनाकडे आपण वळलं पाहिजे. आज मोबाईलच्या जमान्यात माणूस एकटा पडत चाललाय. थिएटरमधे न जाता तो मोबाईलवर सिनेमा बघतोय. उंदराने लेंड्या टाकाव्यात तसा तो सगळीकडे फोटो टाकत सुटलाय. एखादी गोष्ट तो डोळ्यांनी पाहायची विसरून गेलाय. हे चुकीचं आहे. आज बायोपिक बनवले जाताना नको तेवढी तथाकथित सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते. मग तो बायोपिक तरी कसा म्हणायचा, असं परखड मत प्रख्यात अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी कोहापुरात व्यक्त केलं. मी माझं म्हणणं मांडत असताना कदाचित मला थांबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असंही ते मिश्कीलपणे म्हणाले.

 

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या (kiff) समारोप प्रसंगी ते बोलत होते. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूरला आयनॉक्समधे kiff सुरू होता. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हे आयोजक होते. च्रंद्रकांत जोशी आणि दिलीप बापट यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. त्यानिमित्ताने कोल्हापूरकरांना दर्जेदार सिनेमांची मेजवानी मिळाली. परवा या फेस्टीवलचा समारोप आणि मराठी सिनेमांच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले.

 

दि. बा. मोकाशींच्या आमोद सुनियासी आले, या कथेवर आधारित ‘दिठी’ हा पावसाचा आणि अध्यात्माचा विलक्षण अनुभव देणाऱ्या सुमित्रा भावे दिग्दिर्शीत चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर प्रेक्षक पसंतीचा आणि सर्वोत्कृष्ट दिगृदर्शनाचा पुरस्कार कोल्हापूरची निर्मिती असलेल्या इमॅगो या तरल भावस्पर्शी सिनेमाला मिळाला. लेखक दिग्दर्शक करण चव्हाण आणि विक्रम पाटील. हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाने बघितलाच पाहिजे.

 

‘म्होरक्या’ या अफलातून सिनेमाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. लेखक दिग्दर्शक अमोल भारत देवकर. बार्शी ह्या दुष्काळी भागात चित्रित झालेला हा सिनेमा अजब आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणारे हे तिन्ही सिनेमे बघणं प्रेक्षकांना कंपलसरी आहे. सिनेमाचे बारकावे टिपता यावेत म्हणून यंदापासून हा महोत्सव आयनॉक्समधे आपण घेत आहोत असं चंद्रकांत जोशी यांनी सांगितलं तर सिनेमा म्हणजे आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे, ठेव आहे. म्हणून सिनेमा प्रामाणिकपणे केला पाहिजे असं सुमित्रा भावे यांनी सांगितलं. बाबुराव पेंटर पुरस्कारविजेते संकलक अमोल देशपांडे यांनीही आपलं मनोगत अत्यंत थोडक्यात एडिट करून कथन केलं. विजय तेंडुलकरना आपण शेवटच्या काळात भेटायला गेलो होतो, तेव्हा मी संकलक आहे असं कळताच ‘भागतं का’ असं त्यांनी विचारलं होतं. छोटी-मोठी कामं मिळतात. त्यामुळे भागतं असं म्हटल्यावर आणि नाही असं म्हणूपण नकोस, असं त्यांनी सांगितल्याची एक हळवी आठवण त्यांनी सांगितली. सर्व पुरस्कारविजेत्यांनी आपली मनोगत दोन-दोन मिनिटांत नेमकेपणाने व्यक्त केली. त्यामुळे समारोपाचा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला.”
 
 
 

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content