HomeArchiveशिवसेना बिथरली?

शिवसेना बिथरली?

Details

 
 

 

राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने यासाठी थेट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायऱ्या झिजवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्रीपद शिवसेनेने सोडले. त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर काढले गेले. त्यामुळे संसदेत त्यांच्यावर विरोधी बाकांवर बसणे भाग पडले. इतके करूनही आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याचे दिसू लागल्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक बिथरू लागले आहेत. मुंबईतल्या गिरगाव भागात शिवसैनिकांनी मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरूद्ध हिंसक आंदोलन केले.
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 
 

 

 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content