HomeArchiveशिवनेरकार विश्वनाथराव वाबळे...

शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

Details
शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराने १२ ज्येष्ठ पत्रकार सन्मानित!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी १२ ज्येष्ठ पत्रकारांना `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

`शिवनेर’कार वाबळे क्रीडाप्रेमी होते. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ. यादृष्टीने शिवनेर, सावतमाळी भुवन ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची जलद बुद्धिबळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 48 मुला-मुलींनी भाग घेतला. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे वितरण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय बरदाडे व रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सूर्यकांत फातर्फेकर, संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, प्रदीप म्हापसेकर, श्रीकांत नाईक, विजयकुमार बांदल, लीलाधर चव्हाण, सुधाकर काश्यप, संजय परब आणि प्रकाश सावंत. नंदकुमार काटकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता केली. तोच वारसा आज `शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे चालवत आहेत, असे ते म्हणाले. सावतामाळी भुवन ट्रस्टचे हेमंत मंडलिक आणि सदानंद पोहेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी `शिवनेर’च्या वतीने संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला एक कॅरम बोर्ड, स्टॅण्ड आणि चार बुद्धिबळ सेट भेट दिले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी ते स्वीकारले.

 
 
 
 
 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी १२ ज्येष्ठ पत्रकारांना `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

`शिवनेर’कार वाबळे क्रीडाप्रेमी होते. बुद्धिबळ हा त्यांचा आवडता खेळ. यादृष्टीने शिवनेर, सावतमाळी भुवन ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांची जलद बुद्धिबळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 48 मुला-मुलींनी भाग घेतला. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे वितरण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय बरदाडे व रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

`शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सूर्यकांत फातर्फेकर, संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, स्वाती घोसाळकर, जगदीश भोवड, प्रदीप म्हापसेकर, श्रीकांत नाईक, विजयकुमार बांदल, लीलाधर चव्हाण, सुधाकर काश्यप, संजय परब आणि प्रकाश सावंत. नंदकुमार काटकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांनी तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता केली. तोच वारसा आज `शिवनेर’चे संपादक नरेंद्र वि. वाबळे चालवत आहेत, असे ते म्हणाले. सावतामाळी भुवन ट्रस्टचे हेमंत मंडलिक आणि सदानंद पोहेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी `शिवनेर’च्या वतीने संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला एक कॅरम बोर्ड, स्टॅण्ड आणि चार बुद्धिबळ सेट भेट दिले. पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी ते स्वीकारले.

 
 
 
 
 
 
 
 ”
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content