HomeArchiveशासकीय योजनांपासून अल्पसंख्याक...

शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

Details
शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 
“शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

 

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content