HomeArchiveवेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून...

वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

Details
वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

 
 

 ”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
“येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.”
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
“येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.”

 
 

 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content