HomeArchiveवेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून...

वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

Details
वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून होते गणपती विसर्जन

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

 
 

 ”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
केरळनंतर देशात मासेमारीत दुसरा क्रमांक असणाऱ्या मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकापासून सात किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जन सोहळयासाठी सज्ज झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सायंकाळपासून वेसावे समुद्ररकिनारी पश्चिम उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी येण्यास सुरूवात होणार असून सुमारे १२५ मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.
 
 
“येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा, असे दोन तराफे तयार करण्यात आले असून येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास चार बोटीदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. येथील विसर्जन सोहळा उद्या दि. १३ रोजी, (दुसऱ्या दिवशी) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.”
 
 
येथे शिपीलच्या (छोट्या बोटी) तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तींपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते. येथील नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष जगदीश भिकरू व सचिव मनोज कास्कर यांनी केला.
 
 
“येथील गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. 1995पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र १९९५पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेश मूर्ती आणि अनंत चतुर्दशीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. तराफ्यावर फळी ठेऊन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. या विसर्जनाच्या कार्यात या जमातीचे सुमारे ३०० कार्यकर्ते झटत असतात, असे मांडवी गल्ली कोळी जमातीचे सचिव मितेश चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.”

 
 

 

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content