HomeArchiveवेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल...

वेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा लवकरच – भारती लव्हेकर

Details
वेसाव्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा लवकरच – भारती लव्हेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मासेमारीत केरळनंतर वेसावे कोळीवाड्याचा नंबर लागतो. येथे सुमारे 350 यांत्रिकी नौका असून येथील दोन मच्छिमार सहकारी सोसायट्यांचा गेल्या 20 महिन्यांचा डिझेल परतावा लवकर देण्यात येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वर्सोव्याच्या भाजपाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना दिले.

येथील वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा 13.2 कोटी व वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड या मच्छिमार सहकारी संस्थेचा 2.60 कोटी असा गेल्या 20 महिन्यांचा मिळून 16 कोटी 62 लाख रूपये डिझेल प्रतिपूर्ती परतावा अर्थसंकल्पात तरतूद करूनही अजून मिळालेला नाही. त्यामुळे वेसावकर हवालदिल झाले आहेत. डिझेल व मासेमारी साधनांचे भाव वाढल्याने मासेमारी करणे येथील मच्छिमारांना मुश्किल झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर परताव्याची रक्कम वितरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आमदार डॉ. लव्हेकर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही वेसावे कोळीवाड्यातील सदर दोन मच्छिमार सहकारी संस्थांना लवकर प्राधान्याने डिझेल परतावा मिळेल असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

येथील मच्छिमारांच्या विविध समस्या मार्गी लागण्यासाठी लव्हेकर यांनी अलीकडेच वेसाव्यातील विविध मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांची महत्त्वाची संयुक्त बैठक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुमंत भांगे यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. 2014 मध्ये येथून आमदार म्हणून निवडून आल्यापासून येथील मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे व विधानसभेतदेखील विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मासेमारीत केरळनंतर वेसावे कोळीवाड्याचा नंबर लागतो. येथे सुमारे 350 यांत्रिकी नौका असून येथील दोन मच्छिमार सहकारी सोसायट्यांचा गेल्या 20 महिन्यांचा डिझेल परतावा लवकर देण्यात येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वर्सोव्याच्या भाजपाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना दिले.

येथील वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा 13.2 कोटी व वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड या मच्छिमार सहकारी संस्थेचा 2.60 कोटी असा गेल्या 20 महिन्यांचा मिळून 16 कोटी 62 लाख रूपये डिझेल प्रतिपूर्ती परतावा अर्थसंकल्पात तरतूद करूनही अजून मिळालेला नाही. त्यामुळे वेसावकर हवालदिल झाले आहेत. डिझेल व मासेमारी साधनांचे भाव वाढल्याने मासेमारी करणे येथील मच्छिमारांना मुश्किल झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सदर परताव्याची रक्कम वितरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आमदार डॉ. लव्हेकर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही वेसावे कोळीवाड्यातील सदर दोन मच्छिमार सहकारी संस्थांना लवकर प्राधान्याने डिझेल परतावा मिळेल असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

येथील मच्छिमारांच्या विविध समस्या मार्गी लागण्यासाठी लव्हेकर यांनी अलीकडेच वेसाव्यातील विविध मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांची महत्त्वाची संयुक्त बैठक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुमंत भांगे यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. 2014 मध्ये येथून आमदार म्हणून निवडून आल्यापासून येथील मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे व विधानसभेतदेखील विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content