HomeArchiveवृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण...

वृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण व्हावे – डॉ. श्रीकांत शिंदे

Details
वृक्षारोपण कार्यक्रमांचे लेखापरीक्षण व्हावे – डॉ. श्रीकांत शिंदे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जंगलात आगी लागण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असून यासंदर्भात काही कडक कायदे तसेच शिक्षा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

केंद्र सरकारचे राष्ट्रीय वन्य धोरण देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३३ टक्के हिस्सा वनांखाली आणि हरितकरणाखाली आणण्यासाठी आखले गेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन मंत्रालयांची धोरणे यासाठी सुसंगत आहेत. जागतिक तापमानवाढीला तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हे याबाबत एक अत्यंत परिणामकारक पाऊल आहे. परंतू या वनीकरणाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

 

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तब्बल ४९ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ साली अशाप्रकारच्या २४ हजार ८१७ घटना घडल्या होत्या तर २०१८ साली हे प्रमाण ३७ हजार ५९ वर गेले आहे. आगीच्या घटना केवळ राष्ट्रीय उद्यानांमध्ये घडलेल्या नाहीत तर मुंबईसारख्या ठिकाणी शहरी वनांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अशाप्रकारच्या तब्ब्ल १००० घटना घडल्या असून यात तब्बल साडेसहा हजार हेक्टर वनसंपत्तीचा तसेच ११०० कोटी रूपयांचा चुराडा झाला आहे. ९० टक्के आगीच्या घटना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपामुळे घडतात असे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

आपणही अनेक वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतले आणि त्यात हजारो नागरिकांनी सहभागही घेतला. परंतू अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा ठिकाणीही आगी लागण्याचे प्रकार घडले असून त्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यासंदर्भात वनविभाग अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जाऊन निष्काळजी अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी तसेच वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, ज्यायोगे वृक्षारोपणातल्या वृक्षांची संख्या लक्षात घेतली जाऊन अशा स्वरूपांच्या कार्यक्रमांचे फलित लक्षात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जंगलात आगी लागण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असून यासंदर्भात काही कडक कायदे तसेच शिक्षा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

केंद्र सरकारचे राष्ट्रीय वन्य धोरण देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३३ टक्के हिस्सा वनांखाली आणि हरितकरणाखाली आणण्यासाठी आखले गेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन मंत्रालयांची धोरणे यासाठी सुसंगत आहेत. जागतिक तापमानवाढीला तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण हे याबाबत एक अत्यंत परिणामकारक पाऊल आहे. परंतू या वनीकरणाची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

 

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तब्बल ४९ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ साली अशाप्रकारच्या २४ हजार ८१७ घटना घडल्या होत्या तर २०१८ साली हे प्रमाण ३७ हजार ५९ वर गेले आहे. आगीच्या घटना केवळ राष्ट्रीय उद्यानांमध्ये घडलेल्या नाहीत तर मुंबईसारख्या ठिकाणी शहरी वनांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अशाप्रकारच्या तब्ब्ल १००० घटना घडल्या असून यात तब्बल साडेसहा हजार हेक्टर वनसंपत्तीचा तसेच ११०० कोटी रूपयांचा चुराडा झाला आहे. ९० टक्के आगीच्या घटना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपामुळे घडतात असे शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

आपणही अनेक वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतले आणि त्यात हजारो नागरिकांनी सहभागही घेतला. परंतू अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा ठिकाणीही आगी लागण्याचे प्रकार घडले असून त्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. यासंदर्भात वनविभाग अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जाऊन निष्काळजी अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी तसेच वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे, ज्यायोगे वृक्षारोपणातल्या वृक्षांची संख्या लक्षात घेतली जाऊन अशा स्वरूपांच्या कार्यक्रमांचे फलित लक्षात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.”
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content