HomeArchiveवक्फ मंडळाला पूर्णवेळ...

वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी

Details
“वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”
 
“राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content