HomeArchiveलोकसभा निवडणुकीत मिळालेल्या...

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

Details
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण 4 लाख 24 हजार 913 मते मिळाली होती. मतांच्या या संख्येइतकेच वृक्ष येत्या 5 वर्षांत लावण्याचे राहुल शेवाळे यांनी ठरविले आहे.

‘प्लांट अ होप’ (Plant a Hope) अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे. येत्या 10 जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाची, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरूवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ‘प्लांट अ होप’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा करतो, असे राहुल शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण 4 लाख 24 हजार 913 मते मिळाली होती. मतांच्या या संख्येइतकेच वृक्ष येत्या 5 वर्षांत लावण्याचे राहुल शेवाळे यांनी ठरविले आहे.

‘प्लांट अ होप’ (Plant a Hope) अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे. येत्या 10 जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाची, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरूवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ‘प्लांट अ होप’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा करतो, असे राहुल शेवाळे म्हणाले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content