HomeArchiveलघुपट हे व्यक्त...

लघुपट हे व्यक्त होणाऱ्या युवा पिढीचे माध्यम – दिग्दर्शक उमेश कुळकर्णी

Details
लघुपट हे व्यक्त होणाऱ्या युवा पिढीचे माध्यम – दिग्दर्शक उमेश कुळकर्णी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

‘आजची तरूणाई व्यक्त होऊ पाहत आहे. तिच्या हातात संवादाचे आधुनिक माध्यम आले आहे. त्याद्वारे लघुपट निर्माण करून ती आपले प्रश्न, आपले विषय ताकदीने जगासमोर आणत आहे’, असे प्रतिपादन ‘वळू, ‘विहिर’, देऊळ’ असे वेगळ्या घाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक उमेश कुळकर्णी यांनी कोल्हापुरात नुकतेच केले.

 

कोल्हापूरच्या राजर्षि शाहू स्मारकामध्ये ‘हमीद-द अनसंग हृयुमॅनिस्ट’ हा ज्योती सुभाष दिग्दर्शित माहितीपट दाखवून कोल्हापूर शॉर्ट फिल्म क्लबचे औपचारिक उद्घाटन झाले, त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी या माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हमीद दलवाई या सच्च्या समाजसुधारकाचा जीवनपट रसिकांनी यात अनुभवला. त्यानंतर दिग्दर्शिका ज्योती सुभाष, सहदिग्दर्शक ओंकार बर्वे, उमेश कुलकर्णी यांच्याशी रसिकांचा मुक्त संवाद झाला. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी याची सूत्रे सांभाळली.

 

“मेहरुन्निसा दलवाई यांचे मनोगत मी एका पुरस्कार वितरणाच्या वेळी ऐकले. मग झपाटून जावून मी त्यांची सगळी पुस्तकं विकत घेतली आणि ठरवलं की आपण हे कार्य जगासमोर आणायचेच. इंधन ही कादंबरी पूर्वी कधीतरी वाचली होती. ती परत वाचली. त्यांचं ललित साहित्य वाचलं. आपण आपल्याला आवडलेलं एखादं घर, दागिने किंवा कपडे वाटेल तेवढे पैसे खर्चून आपण घेतो .मग आपण या चांगल्या कामासाठी खर्च करायला काय हरकत आहे हा विचार करून मी ही फिल्म केली”, असं ज्योती सुभाष म्हणाल्या.

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून मुस्लिम समाजातील वाईट प्रथांविरोधात लढा देणाऱ्या हमीद दलवाईंचे अप्रतिम चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व यांना विरोध आणि समान नागरी कायद्याची आग्रही मागणी यासाठी त्यांनी मुंबईमध्ये अवघ्या सात तलाकपिडीत महिलांना घेऊन मोर्चा काढला आणि एका मोठ्या लढाईला सुरूवात झाली. हमीद दलवाईंच्या अकाली निधनाने या चळवळीला मोठा धक्का बसला. दलवाईंची वैचारिक भूमिका, त्यांचे लेखन, कार्य यावर या माहितीपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

माहितीपटामधे ज्योती सुभाष, अमृता सुभाष, नसिरूदृीन शाह, हमीद दाभोळकर येत राहतात आणि फिल्मचा धागा पुढे नेतात. हुसेन दलवाई हे त्यांचे बंधु, बाबा आढाव, रामचंद्र गुहा, सुमित्रा भावे, भाई वैद्य, अन्वर राजन, रजिया पटेल, विनोद शिरसाठ या सुह्दांची मनोगते यात बघायला मिळतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश बगाडे यांनी केले.”
 
“डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]

‘आजची तरूणाई व्यक्त होऊ पाहत आहे. तिच्या हातात संवादाचे आधुनिक माध्यम आले आहे. त्याद्वारे लघुपट निर्माण करून ती आपले प्रश्न, आपले विषय ताकदीने जगासमोर आणत आहे’, असे प्रतिपादन ‘वळू, ‘विहिर’, देऊळ’ असे वेगळ्या घाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक उमेश कुळकर्णी यांनी कोल्हापुरात नुकतेच केले.

 

कोल्हापूरच्या राजर्षि शाहू स्मारकामध्ये ‘हमीद-द अनसंग हृयुमॅनिस्ट’ हा ज्योती सुभाष दिग्दर्शित माहितीपट दाखवून कोल्हापूर शॉर्ट फिल्म क्लबचे औपचारिक उद्घाटन झाले, त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी या माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हमीद दलवाई या सच्च्या समाजसुधारकाचा जीवनपट रसिकांनी यात अनुभवला. त्यानंतर दिग्दर्शिका ज्योती सुभाष, सहदिग्दर्शक ओंकार बर्वे, उमेश कुलकर्णी यांच्याशी रसिकांचा मुक्त संवाद झाला. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी याची सूत्रे सांभाळली.

 

“मेहरुन्निसा दलवाई यांचे मनोगत मी एका पुरस्कार वितरणाच्या वेळी ऐकले. मग झपाटून जावून मी त्यांची सगळी पुस्तकं विकत घेतली आणि ठरवलं की आपण हे कार्य जगासमोर आणायचेच. इंधन ही कादंबरी पूर्वी कधीतरी वाचली होती. ती परत वाचली. त्यांचं ललित साहित्य वाचलं. आपण आपल्याला आवडलेलं एखादं घर, दागिने किंवा कपडे वाटेल तेवढे पैसे खर्चून आपण घेतो .मग आपण या चांगल्या कामासाठी खर्च करायला काय हरकत आहे हा विचार करून मी ही फिल्म केली”, असं ज्योती सुभाष म्हणाल्या.

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून मुस्लिम समाजातील वाईट प्रथांविरोधात लढा देणाऱ्या हमीद दलवाईंचे अप्रतिम चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व यांना विरोध आणि समान नागरी कायद्याची आग्रही मागणी यासाठी त्यांनी मुंबईमध्ये अवघ्या सात तलाकपिडीत महिलांना घेऊन मोर्चा काढला आणि एका मोठ्या लढाईला सुरूवात झाली. हमीद दलवाईंच्या अकाली निधनाने या चळवळीला मोठा धक्का बसला. दलवाईंची वैचारिक भूमिका, त्यांचे लेखन, कार्य यावर या माहितीपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

माहितीपटामधे ज्योती सुभाष, अमृता सुभाष, नसिरूदृीन शाह, हमीद दाभोळकर येत राहतात आणि फिल्मचा धागा पुढे नेतात. हुसेन दलवाई हे त्यांचे बंधु, बाबा आढाव, रामचंद्र गुहा, सुमित्रा भावे, भाई वैद्य, अन्वर राजन, रजिया पटेल, विनोद शिरसाठ या सुह्दांची मनोगते यात बघायला मिळतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश बगाडे यांनी केले.”
 
 
 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content