HomeArchiveराहुळ शेवाळेंचे काम...

राहुळ शेवाळेंचे काम येऱ्यागबाळ्याचे नव्हे – उद्धव ठाकरे

Details
राहुळ शेवाळेंचे काम येऱ्यागबाळ्याचे नव्हे – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राहुल शेवाळे यांनी जे काम केलं, ते येरागाबाळ्याचं काम नाही. आणि या कामासाठी राहुल, तुला धारावीच्या अनेक पिढ्या आशीर्वाद देतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीतल्या सभेत उत्तर-मधय मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पाठ थोपटली.

रविवारी शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या 90 फिट रोडवर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला रश्मी ठाकरे, शिवसेना ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, सदा सरवणकर, आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, राजेश शिरवाडकर, महिला सचिव दिव्या ढोले, कामिनी शेवाळे आदी उपस्थित होते.

धारावीच्या सभेत ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाच वर्षांतील कामाची स्तुती केली. राहुलचा जन्म धारावीत झाल्याने त्याला धारावीच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये धारावीच्या विकासाआड येणारे फनेल झोन आणि इतर समस्या राहुलने सोडवल्या. एसपीव्ही, स्मार्ट सिटी अशा अनेक माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कामगिरीमुळे धारावीचा पुनर्विकास लवकरच होईल आणि मी इथे उद्घाटनासाठी येईन, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्ही विजयाचे झेंडे फडकवले, कारण आमच्यासोबत आहेत रामदास आठवले. हा उत्साह आणि मजबुती मला 29 तारखेला दिसली पाहिजे. धारावीतून मला विजयाचे फटाके फुटताना पाहयचे आहे. धारावीतील शिवसैनिक निष्ठेने भगवा हातात पकडून आहेत. नगरसेवकाची कारकीर्द उत्तमरित्या पार पडल्याने राहुल शेवाळे यांना लोकसभेची संधी दिली आहे. धारावी शेवाळे यांची जन्मभूमी असल्याने धारावीकरांचा त्यांना पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

 

इतरांनी धारावीतून निवडून येऊन फक्त थापा मारल्या. मुंबईची निगा राखणारे लोक धारावीत राहतात. यांची निगा आपल्याला राखायची आहे. शिवसेनेचा शब्द आहे. योजना फक्त कागदावर राहणार नाहीत. त्या अंमलात आणल्या जातील. या मतदारसंघातल्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाला मी स्वतः हजर राहीन. राहुल शेवाळे यांनी धारावीला ब्रँड दिला आहे- मेड इन धारावी. धारावीतील वस्ती सुधारावी ही शिवसेनेची इच्छा आहे, से ते म्हणाले.

आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो म्हणून गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे. केंद्रात करामध्ये 40 टक्के भार मुंबई आणि महाराष्ट्र उचलते. मुंबईत रस्ते विकासासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी, जलद विकास करण्यासाठी राहुल मला खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाहिजेत. पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. देशातील जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने पाकिस्तानात घुसून मात्र त्यांचा पाडाव केला. देश कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करा, असेही ठाकरे यांनी बजावले.

युतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. तसे तुमचे उमेदवार कोण? महाआघाडीला सत्ता द्यायला त्यांच्याकडे काही ध्येयधोरणे आहेत का? चांगला उमेदवार आहे का? युतीचा जाहीरनामा पाहा आणि आघाडीचा पाहा. देशद्रोहावरचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार आहेत आणि आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत. शिवरायांनी कधीही गद्दारांना माफ केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

विजयाची कुस्ती मारावी

राहुल शेवाळे यांनी विजयाची कुस्ती मारावी. कारण त्यांच्या पाठी आहे धारावी. एकनाथ गायकवाड आणि ही कुस्ती हवी. कारण त्यांच्या पाठीशी नाही धारावी. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस यांनी आपले वाद कायमचे मिटवले. कारण त्यांच्या पाठी होते रामदास आठवले. शिवशक्ती आणि भीमशक्तीला बाळासाहेबांनी नटवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही हटवले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले तुम्ही करू नका नखरे. राहुल शेवाळे तुम्हाला लोकसभेत पाठवणार आहेत उद्धव ठाकरे, अशा चारोळ्या करत रामदास आठवले यांनी उपस्थितांना शेवाळे यांना मत देण्याचे आवाहन केले.

शिवसेना नेते लीलाधर डाके म्हणाले की, राहुल शेवाळे आपली बऱ्याच वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. शरद ऋतुतले मेघ फक्त गर्जना करतात. पाऊस नाही पडत. तसेच विरोधक फक्त गर्जना करतात. शेवाळे यांना स्वतःच्या कृतीवर विश्वास आहे. प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.

महायुतीचे उमेदवार शेवाळे यांनी या सभेत, धारावी पुनर्विकासासाठी केलेल्या कामांची माहीत देत काँग्रेसच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. मी तेरा वर्षांचा असताना गायकवाड आमदार झाले. 30-40 वर्षं गायकवाड कुटुंबियांनी स्वतःचा विकास केला, मात्र धारावीचा विकास केला नाही. ‘क्या हुआ तेरा वादा?’ हा प्रश्न विचारायला गायकवाड यांना लाज वाटायला हवी. शिवसेना वादा नाही, तर वचन देते आणि ते वचन शिवसेना पाळते. येत्या 29 तारखेला जनताच गायकवाड यांना त्यांच्या वाद्याची आठवण करून देईल, अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना आव्हान दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राहुल शेवाळे यांनी जे काम केलं, ते येरागाबाळ्याचं काम नाही. आणि या कामासाठी राहुल, तुला धारावीच्या अनेक पिढ्या आशीर्वाद देतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीतल्या सभेत उत्तर-मधय मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पाठ थोपटली.

रविवारी शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या 90 फिट रोडवर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला रश्मी ठाकरे, शिवसेना ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, सदा सरवणकर, आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, राजेश शिरवाडकर, महिला सचिव दिव्या ढोले, कामिनी शेवाळे आदी उपस्थित होते.

धारावीच्या सभेत ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाच वर्षांतील कामाची स्तुती केली. राहुलचा जन्म धारावीत झाल्याने त्याला धारावीच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये धारावीच्या विकासाआड येणारे फनेल झोन आणि इतर समस्या राहुलने सोडवल्या. एसपीव्ही, स्मार्ट सिटी अशा अनेक माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कामगिरीमुळे धारावीचा पुनर्विकास लवकरच होईल आणि मी इथे उद्घाटनासाठी येईन, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्ही विजयाचे झेंडे फडकवले, कारण आमच्यासोबत आहेत रामदास आठवले. हा उत्साह आणि मजबुती मला 29 तारखेला दिसली पाहिजे. धारावीतून मला विजयाचे फटाके फुटताना पाहयचे आहे. धारावीतील शिवसैनिक निष्ठेने भगवा हातात पकडून आहेत. नगरसेवकाची कारकीर्द उत्तमरित्या पार पडल्याने राहुल शेवाळे यांना लोकसभेची संधी दिली आहे. धारावी शेवाळे यांची जन्मभूमी असल्याने धारावीकरांचा त्यांना पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

 

इतरांनी धारावीतून निवडून येऊन फक्त थापा मारल्या. मुंबईची निगा राखणारे लोक धारावीत राहतात. यांची निगा आपल्याला राखायची आहे. शिवसेनेचा शब्द आहे. योजना फक्त कागदावर राहणार नाहीत. त्या अंमलात आणल्या जातील. या मतदारसंघातल्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाला मी स्वतः हजर राहीन. राहुल शेवाळे यांनी धारावीला ब्रँड दिला आहे- मेड इन धारावी. धारावीतील वस्ती सुधारावी ही शिवसेनेची इच्छा आहे, से ते म्हणाले.

आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो म्हणून गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे. केंद्रात करामध्ये 40 टक्के भार मुंबई आणि महाराष्ट्र उचलते. मुंबईत रस्ते विकासासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी, जलद विकास करण्यासाठी राहुल मला खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाहिजेत. पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. देशातील जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने पाकिस्तानात घुसून मात्र त्यांचा पाडाव केला. देश कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करा, असेही ठाकरे यांनी बजावले.

युतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. तसे तुमचे उमेदवार कोण? महाआघाडीला सत्ता द्यायला त्यांच्याकडे काही ध्येयधोरणे आहेत का? चांगला उमेदवार आहे का? युतीचा जाहीरनामा पाहा आणि आघाडीचा पाहा. देशद्रोहावरचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार आहेत आणि आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत. शिवरायांनी कधीही गद्दारांना माफ केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

विजयाची कुस्ती मारावी

राहुल शेवाळे यांनी विजयाची कुस्ती मारावी. कारण त्यांच्या पाठी आहे धारावी. एकनाथ गायकवाड आणि ही कुस्ती हवी. कारण त्यांच्या पाठीशी नाही धारावी. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस यांनी आपले वाद कायमचे मिटवले. कारण त्यांच्या पाठी होते रामदास आठवले. शिवशक्ती आणि भीमशक्तीला बाळासाहेबांनी नटवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही हटवले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले तुम्ही करू नका नखरे. राहुल शेवाळे तुम्हाला लोकसभेत पाठवणार आहेत उद्धव ठाकरे, अशा चारोळ्या करत रामदास आठवले यांनी उपस्थितांना शेवाळे यांना मत देण्याचे आवाहन केले.

शिवसेना नेते लीलाधर डाके म्हणाले की, राहुल शेवाळे आपली बऱ्याच वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. शरद ऋतुतले मेघ फक्त गर्जना करतात. पाऊस नाही पडत. तसेच विरोधक फक्त गर्जना करतात. शेवाळे यांना स्वतःच्या कृतीवर विश्वास आहे. प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.

महायुतीचे उमेदवार शेवाळे यांनी या सभेत, धारावी पुनर्विकासासाठी केलेल्या कामांची माहीत देत काँग्रेसच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. मी तेरा वर्षांचा असताना गायकवाड आमदार झाले. 30-40 वर्षं गायकवाड कुटुंबियांनी स्वतःचा विकास केला, मात्र धारावीचा विकास केला नाही. ‘क्या हुआ तेरा वादा?’ हा प्रश्न विचारायला गायकवाड यांना लाज वाटायला हवी. शिवसेना वादा नाही, तर वचन देते आणि ते वचन शिवसेना पाळते. येत्या 29 तारखेला जनताच गायकवाड यांना त्यांच्या वाद्याची आठवण करून देईल, अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना आव्हान दिले.”
 

Continue reading

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...
Skip to content