HomeArchiveराहुल शेवाळे यांच्या...

राहुल शेवाळे यांच्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ला तरुणांची साद!

Details
राहुल शेवाळे यांच्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ला तरुणांची साद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
भारतीय लोकशाहीबाबत तरुणांची मते जाणून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेली ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ही स्पर्धा युवकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. दक्षिण-मध्य मुंबईत आयोजित केलेल्या या स्पर्धतील 26 विजेत्यांना दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या विजेत्यांना राष्ट्रपती भवन आणि संसद भवनही पाहता येणार आहे.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या निबंध स्पर्धेची दुसरी फेरी आज चेंबूरचे आचार्य महाविद्यालय, सायनचे साधना विद्यालय आणि माटुंग्याचे खालसा माहाविद्यालय याठिकाणी उदंड प्रतिसादात पार पडली. दक्षिण-मध्य मुंबईतील सुमारे 1000 युवक-युवतींनी या स्पर्धेद्वारे लोकशाहीबाबतची आपली मते मांडली.

 

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दक्षिण-मध्य मुंबईतील सर्वच नामांकित महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. डी. जी. रूपारेल, रामनारायण रुईया, पोदार, कीर्ती, स्वामी विवेकानंद, एसआयईएस, एसआयडब्लूएस, खालसा, गुरु नानक, वसंतदादा पाटील, महात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक बड्या महाविद्यालयांतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेद्वारे, लोकशाहीबाबतची आपली प्रगल्भ मते मांडली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी केली. लोकशाहीसारख्या सर्वव्यापी विषयावर, विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाल्याने सर्व स्तरांतून खासदारांच्या या संकल्पनेला विशेष दाद देण्यात येत आहे. युवा पिढीच्या उदंड प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
भारतीय लोकशाहीबाबत तरुणांची मते जाणून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेली ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ही स्पर्धा युवकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. दक्षिण-मध्य मुंबईत आयोजित केलेल्या या स्पर्धतील 26 विजेत्यांना दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या विजेत्यांना राष्ट्रपती भवन आणि संसद भवनही पाहता येणार आहे.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या निबंध स्पर्धेची दुसरी फेरी आज चेंबूरचे आचार्य महाविद्यालय, सायनचे साधना विद्यालय आणि माटुंग्याचे खालसा माहाविद्यालय याठिकाणी उदंड प्रतिसादात पार पडली. दक्षिण-मध्य मुंबईतील सुमारे 1000 युवक-युवतींनी या स्पर्धेद्वारे लोकशाहीबाबतची आपली मते मांडली.

 

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दक्षिण-मध्य मुंबईतील सर्वच नामांकित महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. डी. जी. रूपारेल, रामनारायण रुईया, पोदार, कीर्ती, स्वामी विवेकानंद, एसआयईएस, एसआयडब्लूएस, खालसा, गुरु नानक, वसंतदादा पाटील, महात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक बड्या महाविद्यालयांतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेद्वारे, लोकशाहीबाबतची आपली प्रगल्भ मते मांडली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी केली. लोकशाहीसारख्या सर्वव्यापी विषयावर, विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाल्याने सर्व स्तरांतून खासदारांच्या या संकल्पनेला विशेष दाद देण्यात येत आहे. युवा पिढीच्या उदंड प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.”
 

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content