HomeArchiveराज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा...

राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा संपन्न!

Details
 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“सालाबादप्रमाणे ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे पार पडली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील संघ तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी आर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.”
 
 
या स्पर्धेत टीम ऑफ फोर गटात मान्यवर ब्रीज क्लब विजेते ठरले असून मामा वैद्य चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन दुसरा तर आमनोरा क्लबने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पेअर्स गटात राजू गुळवणी आणि धाक्रस यांनी बाजी मारली त्यांना मोहन गुप्ते स्मृती चषक व रोख पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत पेअर्स प्रकारात अवघ्या वर्षे वयाच्या तीर्थराज याने उत्कृष्ट खेळ करत सगळ्यांचे लक्ष वेधले. सुकृत विजयकर स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता आर्य क्रीडा मंडळ तसेच इतर अनेकांचे सहकार्य लाभले.

 
 
 
 
 
 
 

 

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content