HomeArchiveयवतमाळचे भंपक भित्रे!

यवतमाळचे भंपक भित्रे!

Details
यवतमाळचे भंपक भित्रे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरे! आम्ही हे काय पाहत आहोत? 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक भीतीने थरथर कापत आहेत. त्यांच्या विजारी लघुशंकेने ओल्या झाल्या आहेत. त्यांची झोप उडाली आहे. एका 90 वर्षीय वृद्धेच्या परखड विचारांनी ते घाबरले आहेत. साहित्य संमेलनाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. किंबहुना, साहित्याच्या जागतिक इतिहासात असे भंपक भित्रे कधी आढळले नव्हते. मग ‘मराठी बाणा’ मिरवणार्‍या आमच्या शूर महाराष्ट्रात ते कसे जन्माला आले? प्रख्यात भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजकांनी मोठ्या मानाने साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलविले. वयाची आणि प्रकृतीची पर्वा न करता नयनताराजींनी हे निमंत्रण स्वीकारले. पण आपले विचार ऐकून यवतमाळच्या भेकड मंडळींची गाळण उडेल याची त्यांना काय कल्पना!

 

‘‘देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी,’’ असे नयनताराजींनी आपल्या छापील भाषणात म्हटले होते. पण त्यांचे ते खडे बोल ऐकून शासन दरबारी आपल्याला खडे चरायला लागतील या भीतीने आयोजकांनी त्यांचे निमंत्रणच रद्द केले. हे निमंत्रण रद्द करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आला आम्हाला ठाऊक नाही. आपण या प्रकरणात कोणताही हस्ताक्षेप केला नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. पण मग आयोजकांनी ही पळपुटेपणाची भूमिका का स्वीकारली? नयनतारा सहगल या बंडखोर लेखिका म्हणून प्रख्यात आहेत. सत्ताधीश जर चुकत असतील तर त्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याच्या बाबतीत मशहूर आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या त्या कन्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या सख्या आत्येबहिण. त्यांचे वडील बॅ. रणजीत सीताराम पंडित हे साहित्य संस्कृतीचे विख्यात अभ्यासक. कोकणातील कुडाळ गावचे. उल्लेखनीय गोष्ट अशी की, इंदिरा गांधी यांच्याशी असलेले नातेसंबंध विसरून नयनताराजी आणिबाणीत इंदिरा गांधींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. त्यांना अटकदेखील झाली. याचाच अर्थ त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. त्यांचा विरोध आहे तो भंपक, लाचार आणि असहिष्णू विचारसरणीला. असा विरोध असंख्य भारतीयांचा आहे.

गेल्या साडेचार वर्षांतील मोदी राजवटीतील अनेक पापे आता भुताप्रमाणे राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. त्यावर उतारा म्हणून रा. स्व. संघाने नितीन गडकरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्त्व पुढे आणले आहे. नयनतारा सहगल यांनी आपल्या भाषणात काहीही चुकीचे सांगितले नाही. पुन्हा त्यांचे भाषण हे त्यांचेच आहे. मग आयोजकांनी घाबरण्याचे कारण काय? साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री निधीतून 50 लाख रूपये मिळतात. त्या पैशांवर साहित्य संमेलन पार पडते. नयनताराजी ठरल्याप्रमाणे उद्घाटनासाठी आल्या असत्या तर मुख्यमंत्री देणार असलेली देणगी त्यांनी नाकारली नसती. पण यवतमाळच्या भंपक आणि भित्र्या लोकांना हे कोण सांगणार? नयनताराजींचे निमंत्रण रद्द करून त्यांनी महाराष्ट्राच्या सभ्यतेला, संस्कृतीला आणि साहित्यविश्वाला काळीमा फासला आहे. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो..”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरे! आम्ही हे काय पाहत आहोत? 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक भीतीने थरथर कापत आहेत. त्यांच्या विजारी लघुशंकेने ओल्या झाल्या आहेत. त्यांची झोप उडाली आहे. एका 90 वर्षीय वृद्धेच्या परखड विचारांनी ते घाबरले आहेत. साहित्य संमेलनाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. किंबहुना, साहित्याच्या जागतिक इतिहासात असे भंपक भित्रे कधी आढळले नव्हते. मग ‘मराठी बाणा’ मिरवणार्‍या आमच्या शूर महाराष्ट्रात ते कसे जन्माला आले? प्रख्यात भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजकांनी मोठ्या मानाने साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलविले. वयाची आणि प्रकृतीची पर्वा न करता नयनताराजींनी हे निमंत्रण स्वीकारले. पण आपले विचार ऐकून यवतमाळच्या भेकड मंडळींची गाळण उडेल याची त्यांना काय कल्पना!

 

‘‘देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी,’’ असे नयनताराजींनी आपल्या छापील भाषणात म्हटले होते. पण त्यांचे ते खडे बोल ऐकून शासन दरबारी आपल्याला खडे चरायला लागतील या भीतीने आयोजकांनी त्यांचे निमंत्रणच रद्द केले. हे निमंत्रण रद्द करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आला आम्हाला ठाऊक नाही. आपण या प्रकरणात कोणताही हस्ताक्षेप केला नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. पण मग आयोजकांनी ही पळपुटेपणाची भूमिका का स्वीकारली? नयनतारा सहगल या बंडखोर लेखिका म्हणून प्रख्यात आहेत. सत्ताधीश जर चुकत असतील तर त्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याच्या बाबतीत मशहूर आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या त्या कन्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या सख्या आत्येबहिण. त्यांचे वडील बॅ. रणजीत सीताराम पंडित हे साहित्य संस्कृतीचे विख्यात अभ्यासक. कोकणातील कुडाळ गावचे. उल्लेखनीय गोष्ट अशी की, इंदिरा गांधी यांच्याशी असलेले नातेसंबंध विसरून नयनताराजी आणिबाणीत इंदिरा गांधींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. त्यांना अटकदेखील झाली. याचाच अर्थ त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. त्यांचा विरोध आहे तो भंपक, लाचार आणि असहिष्णू विचारसरणीला. असा विरोध असंख्य भारतीयांचा आहे.

गेल्या साडेचार वर्षांतील मोदी राजवटीतील अनेक पापे आता भुताप्रमाणे राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. त्यावर उतारा म्हणून रा. स्व. संघाने नितीन गडकरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्त्व पुढे आणले आहे. नयनतारा सहगल यांनी आपल्या भाषणात काहीही चुकीचे सांगितले नाही. पुन्हा त्यांचे भाषण हे त्यांचेच आहे. मग आयोजकांनी घाबरण्याचे कारण काय? साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री निधीतून 50 लाख रूपये मिळतात. त्या पैशांवर साहित्य संमेलन पार पडते. नयनताराजी ठरल्याप्रमाणे उद्घाटनासाठी आल्या असत्या तर मुख्यमंत्री देणार असलेली देणगी त्यांनी नाकारली नसती. पण यवतमाळच्या भंपक आणि भित्र्या लोकांना हे कोण सांगणार? नयनताराजींचे निमंत्रण रद्द करून त्यांनी महाराष्ट्राच्या सभ्यतेला, संस्कृतीला आणि साहित्यविश्वाला काळीमा फासला आहे. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो..”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content